बुधवार, १७ जुलै, २०१९

**** स्वास्थ बंध ******

!! श्री स्वामी समर्थ !!
तीन मुखी रुद्राक्ष अग्‍नि देवाच स्‍वरूप मानल गेल आहे. याची देवता ही मंगळ असून हा शरीरातील energy level वाढविण्याचे
काम करतो, रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो, आणि आत्मबल निर्माण कुरून Immune level संतुलित ठेवतो.
|| त्रिमुखश्चैव रुद्राक्षो अप्यग्नित्रय स्वरुपक:
तध्दारणाच्च हुतयुक्तस्य तुष्यति नित्य: ||
श्रीमद् देवीभागवत अ. ६, श्लो. २६
५ मुखी रुद्रक्षावर गुरुच अधिपत्य आहे. त्यामुळे दोन ३ मुखी राद्रक्ष आणि तीन ५ मुखी रुद्राक्ष एकत्र केल्यास किंवा एक तीन मुखी आणि दोन ५ मुखी रुद्राक्ष जरी धारण केले तरी स्वास्थ बंध तयार होतो. Blood pressure कंट्रोल मध्ये राहते, जे मुले अथवा लोक depression/anxiety, diabetes यासारख्या आजारे त्रस्त आहे त्याच्यासाठी उपयुक्त आहे.
“ॐ क्लीम नमः” मंत्राचा जप करत करत धारण करावे.
**** वोटर थेरपी (Water Therapy)*****
तीन ५ मुखी रुद्राक्ष रात्री एक ग्लास पाण्यात ठेवून सकाळी ब्रश करण्याची अगोदर अनोशी पोटी घेतल्याने acidity व ईतर पोटाचे आजार कमी होतात. याचा अनुभव घ्या..
दिपक पिंपळे -९८२३४४८४४९
Image may contain: text

मंगळवार, १८ जून, २०१९

***सरस्वती बंध:******

!! श्री स्वामी समर्थ !!
४ मुखीचे दोन रुद्राक्ष आणि ६ मुखी एक रुद्राक्ष मिळून सरस्वती बंध तयार होते. विद्यार्थांना हे अतिशय फलदायी आणि अभ्यासात एकग्रता वाढवते. हे सर्व उपयांची उपयुक्तता तेव्हाच मिळणार ज्यावेळी कर्माची परीकाष्ठा आपण करणार. याचा प्रतिसाद (feedback) पालकांकडून चांगाला मिळाला आहे, जे विध्यार्थी हे बंध वापरत आहे, १०-१५% मार्कस आणि अभ्यासात वाढ दिसत आहे.
चार मुखी रुद्राक्ष हे ब्रम्हस्वरूप मानले आहे आणि शासक ग्रह हा बुध असून बुद्धीदायक गणेश देखील या रुद्राक्ष देवता मानली आहे. हे रुद्राक्ष धारण केल्याने एकग्रता, स्मरणशक्तीची वाढ होते आणि कुठल्याही शाखेतील शास्त्राच्या आभ्यास होण्यास मदत मिळते त्यामुळे विद्यार्थी, लेखक, कलाकार, पुरोहित यांना फलदायी आहे.
।।चतुर्वक्त्र: स्वयं ब्रह्मा यस्य देहे प्रतिष्टती
स भवेत्सर्वशास्त्रज्ञो द्विजो वेद विदा वर: ।।
पद्मपुराण अ ५७,श्लो ४८
चार मुखी ब्रम्ह आहे आणि हे धारण केल्यास चारही वेदाचे व इतर शास्त्राचे ज्ञान प्राप्त करू शकतो असे पद्म पुराणात संगीतले आहे

शनिवार, १ जून, २०१९

जातक हो…!! प्रश्न कुंडली ही फार महत्त्वाची..हं..!!!


!! श्री स्वामी समर्थ !!

मागील बऱ्याच लेखात मी प्रश्न कुंडलीचे महत्त्व सांगितले आहे आणि हरवलेल्या जातकाची केस देखील प्रश्न आणि जन्म कुंडलीने आपण पाहिली आहे की उत्तरला किती समीपता येते. लक्षात घेतले पाहिजे कि जन्मकुंडली हा जीवनाचा पूर्ण आराखडा आहे त्यात जन्मापासून ते मरणापर्यंत जीवनाच्या घटना दर्शवित असेतच मग विवाह, नौकरी, आथवा संतती याचा देखील आढावा घेता येतो. परंतु चालू जीवनात तत्कालीन प्रश्न उद्भवतात त्यावेळी केवळ प्रश्नकुंडलीच फार समीप उत्तर देऊ शकते.  २३ मे २०१९ रोजी मला एका पुणेस्थित जातकाने प्रश्न केला आणि प्रश्न कुंडलीची माहिती त्यांना असल्याने प्रश्नकुंडलीच मांडावी असे ते म्हणाले. हे ज्या क्षेत्रात काम करतात त्यात पूर्णत: अगदी १००% हे लेबरवर (कामगारावर) अवलंबून आहे आणि त्यांचे सर्व कामगार टीम साधारण दीड तो दोन महिन्यापासून सुटीवर होते, ती सर्व उत्तर भारतातील होती त्यांचा फोन-मोबिईल कुठलाच संपर्क होत नव्हता, आणि जातकाचे शिक्रापूर येथील काम हातातून जाईल अशी त्यांना भीती वाटू लागली, काम मोठ होत, १५ दिवस सुट्टी म्हणून गेलेले कामगार दीड महिना झाला तरी संपर्कात नाही म्हणून काळजी वाटू लागली आणि त्यांनी मला पुढील प्रश्न केला. (कुंडली आणि whatsapp चा त्यांचा feedback अभिप्राय देखील मी दिला आहे).



मुले वेळेत येऊन शिक्रापूर चे काम आपल्याला मिळेल ना ?  मुले नाहीत म्हणून हातातून जाणार नाही ना?”

प्रश्न होरारी tossing पद्धतीने नंबर #१०३ घेऊन, दि. २४/०५/२०१९ वेळ ९:५८:५१ रोजी, स्थळ: औरंगाबाद आणि प्रश्नकुंडली मांडली. कुंडलीत लेबर, नौकर, अथवा कामगार हे ६ व्या स्थानावरून पाहतात.
नियम: जर ६ भावाचा सब हा जर ६-१०-११ पैकीचा कार्येश असून याच भावाच्या दशा-अंतरदशेत हे कामगार कामावर रुजू होतील.

६ व्या भावाचा सव हा शनी (सेवाधारी) असून त्यचे बलवान कार्येश पाहूया.

SATURN* : -4  6  7   5(cuspal) (Conj-KET 4 (JUP 4 ))(Asp-RAH 10 (MER 9  2  11 ))
2-Star-Lord is VEN: 8  3
3-Sub-Lord is KET: 4 (JUP 4 ) 5(cuspal)  (Conj-SAT 4  6  7 )
4-Star-Lord of SubLord is VEN: 8  3


शनी हा २-६-१०-११ या सर्व भावांचा कार्येश आहे यामुळे लेबर लोक कामावर परततील हे सिद्ध झाले.

१० भावाचा (कर्म स्थान) सब गुरु आहे

JUPITER : -  4(cuspal)
2-Star-Lord is MER: 9  2  11 (Conj-SUN 9  1)
3-Sub-Lord is JUP:  4(cuspal) 
4-Star-Lord of SubLord is MER: 9  2  11 (Conj-SUN 9  1)

गुरु बुधाच्या नक्षत्रात २-११-१, २ (धन) १-११ (जातकाची ईछपुर्ति होणे) त्यामुळे जातकाचे शिक्रपुरचे काम जाणार नाही..हे हि निश्चित झाले, तर मग हे लेबर कधी येतील त्यासाठी दशा स्वामी पाहूया.
चंद्र-मंगळ-गुरु हि दशा २३-०५-२०१९ पासून ते ६-०६-२०१९ पर्यंत आहे.

चंद्र हा स्वतःच्या नक्षत्रात असून मंगळाच्या सब मध्ये आहे मंगळ -१० आहे आणि मंगळ आणि गुरु हे दोन्ही ग्रह २-६-१०-११ चे बलवान कार्येश आहेत त्यामुळे वरील कालावधीत लेबर येतील असे सांगितले आणि २८/०५/२०१९ रोजी ३ मुल आली आणि बाकीची सर्व मुले ४/६/२०१९ रोजी येणार आहेत असे त्यांनी कळविले. असे ग्रह-नक्षत्र एका ज्योतिषाला अडचणीत असणाऱ्या जातकाचा प्रश्न सोडविण्यास मदत करतात त्यातच स्वामी महाराज वाचेला साथ देतात हे हि त्रिवार सत्य...

मंगळवार, २१ मे, २०१९

हरवलेले व्यक्ती सापडेल का ? जन्म कुंडली विवेचेन – भाग २


!!श्री स्वामी समर्थ!!
मागील भागात याच जातकाची प्रश्न कुंडलीवरून जातक सापडेल आणि जीविताला धोका आणि मृतदेह घरातील मागील परिसरात पाण्याच्या डबक्यात मिळाला, या सर्व घटना प्रश्न कुंडलीत तंतोतंत दर्शवित होत्या त्याचे विवेचन देखील भागिल भागात प्रश्न कुंडलीत केले आहे. जातकाच्या जन्म कुंडलीचा तपशील प्राप्त झाला आहे. मी जातक सापडेल कि नाही हा प्रश्न केवळ मात्र प्रश्न कुंडलीने सोडविला आहे, जन्म कुंडलीने नाही, हे येथे नमूद करू ईच्छितो, अशा काही प्रश्नांना प्रश्न कुंडलीची साथ मिळत असते, तत्कालीन प्रश्न हे प्रश्न कुंडलीवरून सोडवण्यात समीपता आणि यश मिळते. या जातकाचा जन्म कुंडली हि दिलेल्या तपशिलानुसार मी तयार केली, जातक अल्पआयु आहे, जीवनातील हि घटना याचा आढावा पाहूया.
जन्म तारीख: १४/०८/१९८८, जन्म वेळ: ०२:४५ जन्म स्थळ: ७३’ पू ९’’/ १९’ उ १५’’
प्रथम आयुष्यामानाचे काही नियम पाहूया.
लग्न भावाचा (प्रथम भाव) सब हा १-५-९-११ या भावाचा कार्येश असेल तर जातक हा दिघार्युषी असतो, जर हा सब २-६-७-८-१२ या भावाच्या कार्येश असून मारक आणि बाधक स्थानाचा (लग्नात चर राशी – ११ स्थान/स्थिर राशी – ९ स्थान/द्विस्वभावी – ७ स्थान बाधक स्थान असते) कार्येश असेल तर जातक हा अल्पायुषी असतो आणि मारक भाव हे २ आणि ७ आहेत. वरील सांगितलेल्या दोन्ही समान भाव दर्शवित असेल तर तो मध्यायु असतो. शास्रतात ३३ वर्षे अल्पायु आणि ६६ वर्षाच्या वर जगाला तर त्यास पूर्णआयु सांगितले आहे. असे काही नियम आहेत.
पुन्हा मी आपणास सांगू ईच्छितो तो की कधीहि आयुष्यमानाचे प्रश्न ज्योतिषाला विचारू नये केवळ अति संकटाच्या वेळी आथवा बिकट परस्थितीमध्येच हे पाहावे लागते याचे कारण जातकाचे आयुष्याची डोर हि कर्म, प्रारब्ध, संचित आणि भोग यावर अवलंबून असते आणि त्याची परीपक्व फलित तो परमेश्वर परमात्मा देत असतो. “परमेश्वरा मला आता उचल..!!” असे म्हणारे अंथरूणावर पडलेले असतात पण तो काही नेत नाही कारण त्याच भोग सरलेले नसतात. त्यासाठी सत्कर्म करावे, असो... आपण कुंडलीकडे वळूया...!!


या जातकाच्या कुडलीत लग्न भावाचा सब हा गुरु आहे त्याचे बलवान कार्येश पाहूया..
PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- 12 7 10 Cusp Yuti: (12)
It's N.Swami :-------- Sun:- (2) 3 Cusp Yuti: (3)
It's Sub :------------ Venus:- 1 5 12 Cusp Yuti: (1) Mars-Drusht 10 6 11
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (9) Rashi-Swami Saturn (6) (8) 9
Itself aspects :------ 6 4 8
या ठिकाणी गुरु हा रवी च्या नक्षत्र २ (मारक) ३ (अष्टामाचे ८ वे स्थान-संकट), आणि गुरु १२ स्थानी (मोक्ष स्थानी – अंतिम) तर गुरु सप्तमेश (बाधकेश असून येथे धनु रास (शनी+नेपचून+हर्शल) आहे आणि शनी (कर्म) ६-८ (आयुष्याला धोका) या सर्व भावांचा बलवान कार्येश/एकूण १-२-६-८-१२ या भावाचा बलवान कार्येश झाला आहे त्यामुळे जातक हा अल्पायु आहे असे प्रथम दर्शनी दिसते.
आयुष्याला धोका/अपघात अथवा संकट यासाठी ८ स्थान पाहावे लागते. या कुंडलीत अष्टम साथांचा सब हा शनी आहे. शनीचे बलवान कार्येश ग्रह पाहूया
PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- (6) (8) 9
It's N.Swami :-------- Ketu:- (3) Rashi-Swami Sun (2) 3
It's Sub :------------ Venus:- 1 5 12 Cusp Yuti: (1) Mars-Drusht 10 6 11
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (9) Rashi-Swami Saturn (6) (8) 9
Itself aspects :------ 1 9 4
येथे शनी एकमात्र असा ग्रह आहे जो जीवाला धोका दर्शवित आहे. पहा शनी १ भावार (जातक स्वत:) दृष्टी, तो धनुला असून ६ भावात आहे आणि या ठिकाणी वृश्चिक रास(पाणी साचलेले डबके) हि रास आहे, अष्टम स्थानावरून जातकाचा मृत्यू कसा होईल हे देखील कळवते आणि शनी अष्टमेश (धोका/संकट) आहे. त्यामुळे शनी आहे २-३-६-८ या आयुष्याच्या नकारात्मक भावाचा कार्येश झाला.
आपण आयुष्यमान पहिले, ८ स्थानावरून आयुष्याचा धोका देखील पहिला तर मग आता हि घटना घडली याचा विचार आपण दशास्वामी वरून करूया. यावेळी जातकाला चंद्र–शनी–शनी दशा १४/४/२०१९ ते १५/०७/२०१९ पर्यंत होती. शनी किती आयुष्याला धोका दायक आहे, वर संगीतलेच आहे. आता महादशा स्वामी चंद्र (पाणी तत्त्व) पाहूया:
PLANET : MOON
Itself :-------------- Moon:- (3) 2 Mercury-Yuti (3) 1 (4)
It's N.Swami :-------- Ketu:- (3) Rashi-Swami Sun (2) 3
It's Sub :------------ Mercury:- 3 1 4 Moon-Yuti 3 2
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (3) Rashi-Swami Sun (2) 3
येथे चंद्र देखील ३ (८ चे ८ वे स्थान) २ (मारक) ४ (अंतिम चिरशांती) या भावाचा बलवान कार्येश असून, चंद्र केतूच्या नक्षत्रात असून ३ स्थानी चंद्र आणि केतू ग्रहण योगात आहे आणि जातक हा ३/५/२०१९ सायंकाळी घरातून निघून गेले त्यावेळी अमावास्या सुरु होती दुसऱ्या दिवशी शनी अमावास्याच होती आणि जातक हा मंगळवारी दि. ७/०५/२०१९ रोजी घराच्या मागील भागातील साचलेल्या पाण्याच्या डबक्यात त्याचे शव सापडेल या दिवशि रोहिणी नक्षत्र म्हणजेच चंद्राचे नक्षत्र होते. घटनेच्या वेळी गोचारेने चंद्र, रवी किंवा दशास्वामी हे दशास्वामी ग्रहांच्या नक्षत्रात भ्रमण करतात हा नियम देखील कुंडलीत येथे सिद्ध होतो. असे ग्रह, नक्षत्र, आणि राशी मनुष्य जीवनाचा आराखडा सांगतात, बाकी ज्योतिष शास्त्र थोतांड आहे असे म्हणार्यांना अजून काय सिद्द करून दाखवावे. असो....!! नमो नारायण !!

सोमवार, १३ मे, २०१९

“हरवलेली व्यक्ती परत घेईल का (सापडेल का)?....!!!”


श्री स्वामी समर्थ

मागील रविवारी दि. ०५ मे रोजी सकाळी ७ वाजता फोनची रिंग वाजली, माझी स्वामी मठात पूजेची तयारी सुरु होती, खूप अर्जंट आहे व्यक्ती घरातून ३ मे पासून घरातून निघून गेली आहे आणि आपण प्रश्न कुंडली मांडावी आणि त्या व्यक्तीच्या पत्नीने एक होरारी नंबर पाठविला आहे तो देखील मी पाठविला आहे असे तो म्हणाला त्यास मी पूजा आरती झाल्यावर ऑफस मध्ये गेलो कि प्रथम आपली कुंडली मांडून कळवतो असे सांगितले. हा फोन मुंबई येथून होता.

ऑफिस मध्ये आल्यावर कॉम्पुटर सुरु केले आणि प्रथम कुंडली मांडली, हरवलेल्या व्यक्तीच्या पत्नीने ५० हा नंबर दिला, त्यानुसार कुंडली मांडली आणि ७ स्थान (पतीचे स्थान) फिरवून कुंडली (लग्न भाव) तयार केली आणि तीच कुंडली पुढील प्रमाणे आहे.

प्रश्न कुंडली: ५ मे २०१९, रविवार, वेळ: १०:४२:१३, स्थळ: औरंगाबाद, होरारी न. ५०
रूलीग प्लानेट: रवी, मंगळ शुक्र, गुरु, राहू, केतू

नियम:  हरवलेल्या व्यक्तीच्या लग्न भावापासून २-४-११ या भावापैकीचा कार्येश ग्रहाच्या दशा-अंतरदशेत व्यक्ती परत येते.

वरील नियमा व्यतिरिक्त जातकाच्या आयुष्याला काही धोका आहे का, तर अशावेळी लग्न भावाचा सब मारक/बाधक भावाचा कार्येश आहे किंवा नाही हे पाहून तो व्यक्ती जीवित अथवा मृत आहे आहे याचा देखील आढावा घ्यावा लागतो, मंगळ संबध असेल तर पोलिसांची मदत घ्यावी लागते हे सर्व काही पाहावे लागते आणि कुंडलीचा आधार घेऊन अंतिम निष्कर्श येवून उत्तर सोमोरील व्यक्तीस सांगावे लागते. हे नियम पाहूया या कुंडलीत.



कुंडलीत ७ भाव लग्नी मांडला आहे कारण पत्नीने प्रश्न विचारला आहे. या कुंडलीत १ भाव (जातक) आणि ८ भावाचा (धोका, संकट) सब (उपनक्षत्र स्वामी) हा बुध आहे आणि आत बुधाचे बलवान कार्येश ग्रह पाहूया.

० बुध:
केतू: १ (गुरु १२) (यु.शनी १, २, ३) (मंगळ दृ ६)
० रवी:
शुक्र:  ४ ११

एकूण: १-२-३-६-१२ आणि ४-११

बुध हा १ (हरवलेला जातक), १२ (लांब दूर, इस्पितळात, मंदिर), २ (मारक स्थान) ३ (८ चे ८ स्थान) मंगल ६ (पोलिसांचा आधार घेणे) आणि शुक्र मुळे ४ आणि ११ भावाचा कार्येश झाला त्यामुळे जातक हे सापडेल हे निश्चित झाले.

तसेच बुध हा सप्तमेश (बाधक) असून त्यात राहू देखील आहे याचाच अर्थ बुध हा १-२-७-६-१२ या भावाचा कार्येश असल्यामुळे जातकाच्या जीवाला धोका आहे आणि मंगळाचा संबध असल्याने पोलिसाचा आधार घ्यावा लागतो, दुय्यम कार्येश सब रवी हा ९-५ चा कार्येश असल्याने एक आशेचा किरण म्हणजे जातक जीवत आहे असे दर्शविते, आम्हाला अशा महत्वाच्या गोष्टीत एकदम अंतिम निर्णय घेता येत आणि जरी कुंडली पूर्णत: जीवाला धोका दर्शवित असली तरी ५-९ मुळे जातक कदाचित सुरक्षित आहे असे मी समोरील प्रश्न विचारलेल्या व्यक्तीस कळविले आणि दशा स्वामी काय सांगतो याचा विचार केला, तर प्रश्न हा भरणी नक्षत्रात विचारला, त्याचा स्वामी शुक्र आणि शुक्र चतुर्थी स्थानी (घरी घेईल/सापडेल), मीन रास या ठिकाणी (जल तत्वाची रास), शुक्र बुधाच्या नक्षत्रात आहे, बुध चतुर्थात, सप्तमेश (बाधक स्थान), दशमेश (११ चे व्यय) आणि हा शुक्र मंगळाच्या सब मध्ये आहे मंगळ ६ (पोलीस आधार), १२ व्या स्थानाचा अधिपती (हॉस्पिटल, धोका) आणि वृश्चिक रास (साचलेला डबके अथवा गटार) असे दर्शवितो कि दशा देखील पूर्णत: नकारात्मक झाली आहे जातकाच्या जीवाला धोका आहे हे मात्र आता निश्चीत वाटत होते. तरी देखील रुलिंग प्लानेटचा आधार घेऊन समोरील व्यक्तीस आपण पोलिसांची मदत घ्यावी आणि जातक हे मंगळवार ते शुक्रवार पर्यंत सापडतील असे संगीतले, ५-९ भावामुळे ते कदाचित जीवित असतील असे हि सांगितले. परंतू प्रश्न कुंडली अगदी बरोबर सांगत होती, जातकचा मृतदेह मंगळवारी सूर्यास्तापूर्वी त्यांच्याच घरातील मागच्या बाजूच्या डबक्यात तरंगत होता आणि पुढील तपास हे पोलीस करती आहेत.
याच कुंडलीत अजून खूप बारकावे आहेत विचार केला तर प्रत्यक घटनेचे उत्तर मिळते असो कधी कधी कुंडलीत नकारात्मक गोष्टी दिसत असल्यातरी समोरील व्यक्तीस सांगण्याचे धाडस होत नाही, खूप विचार करून समर्पक उत्तर द्यावे लागते. हरवलेल्या व्यक्तीची जन्म कुंडली तपशील प्राप्त झाला आहे, पुढील भागात जन्म कुंडलीचे विवेचण पाहूया...!!! ॐ शांती !!!