सोमवार, १६ सप्टेंबर, २०१९

::::- रत्न विचार - ::::



!! श्री स्वामी समर्थ !!
कृष्णमूर्ती पद्धतीनुसार रत्न कोणती धारण करावीत व् गैरसमजुती ..
ज्योतिष दिपक चंद्रकांत पिंपळे : ९८२३४४८४४९
आजवर इतके लोक ज्योतिष मार्गदर्शनात पाहिले , 90 % लोकांना खड़े व् रत्न धारण करण्याविषयी चुकीचे सल्ले दिले जातात . पुष्कराज घातला की लग्न होत आणि माणिक घातला की नोकरी मिळते , या सर्व भ्रामक कल्पना आहेत . त्याचप्रमाणे टीवी असो वा आजकाल ची ज्योतिष विषयक पुस्तक त्यातही जे कोणती रत्ने धारण करावीत या विषयी 95% चुकीच् लिहिलेल असत. मुळात माझी रास मेष आहे म्हणून मी पोवळ घालतो , धनु रास आहे म्हणून पुष्कराज घालतो ...हेच मुळात चुकीच् आहे . खुप लोक वेगवेगळ्या ज्योतिषी जातात आणि प्रत्येक जन वेगवेगळी रत्न धारण करायला सांगतात , त्यात लोकही द्विधा अवस्थेत येतात की नेमकं कोणत रत्न धारण करावे .?
कुंडली मध्ये बारा स्थान , बारा राशी असतात. त्यापैकी सर्वात महत्वाची स्थान पुढील प्रमाणे ,.... 1 ) बालवयात वय वर्ष सात / आठ पर्यन्त बाळाच आरोग्य चांगल रहावे म्हणून कुंडलीतील पंचम स्थानच जो बलिष्ठ कार्येश ग्रह असेल त्याच रत्न वापराव , कारण पंचम स्थान हे रोगमुक्ति साठी महत्व्पूर्ण स्थान म्हणाव. 2) व्यक्ति शिक्षण घेत असताना , कुंडलीतील चतुर्थ , नवम व् अकरावे स्थान यातील बलिष्ठ कार्येश ग्रहांची रत्ने वापरावीत , कारण 4 व् 9 वे स्थान शिक्षण स्थान असतात . ( काहीजण म्हणतील की 5 वे स्थान विद्या स्थान असते , तर 5 वे स्थान फक्त कलात्मक शिक्षणास उत्तम इतर नाही.) 3) नोकरी असताना , यात जे मार्केटिंग करणारे असतात त्यानी 3 ऱ्या स्थाना संबंधी , डॉ.पेशातील यानी 6 वे , शिक्षक प्रोफेसर यानी 4 व् 9 , ज्यांची बैठी बौद्धिक कार्य व् जे अधिकार पदावर असतात त्यानी 10 , 11 वे स्थानचे , वित्तीय क्षेत्रातील 2 व् 7 , ..साधारण असे स्वरूप् राहील . 4) व्यवसायिक व्यक्तिनी , 3-7-10-11 संबंधी जे उत्तम असेल ते रत्न वापरावे. 5) गृहिणीनी 2-4-7-11 संबंधी जे उत्तम स्थान असेल त्या कार्येश ग्रहाच् रत्न घलाव. 6) हॉस्पिटल मध्ये एडमिट असणारे किंवा सतत आजार असणारे याना 5 वे स्थानच रत्न वापराव. 7) लग्नासाठी 2-7-11 या स्थानांची रत्ने वापरणे. 8)कलाकार लोकांनी 5 व् 7 वे स्थान संबंधी........ शक्यतो , 8-12 या स्थानची रत्न वापरु नयेत. नोकरित असल्यास 8-12 -5-9 या स्थानाची, शिक्षणात असल्यास 3-8-12 ची ,मोठी आजारपीड़ा असल्यास 4-6-12 ची ,विवाह करावयाच असल्यास 1-6-10-12 या स्थानचे कार्येश ग्रहांची रत्ने वापरु नयेत. विवाहा मध्ये 6, 12 व् स्थान प्रखर विवाहविरोधी स्थान , शिक्षणात 3,8,12 ही प्रखर शिक्षणविरोधी स्थान , नोकरीत 1,5,8,9,12 ही प्रखर विरोधी तर आजारपनात 4,12,8 ही अशुभ स्थान असतात म्हणून त्यांचे बलिष्ठ ग्रहांचे रत्न वापरु नए . दूसर म्हणजे , मंगळ कन्या मिथुन राशीत असता पोवळ व् बुध मेष वृचिक राशीत असताना पाचु ,मकर कुंभ वाल्याणी मोती , रवि शनि युतित माणिक वापरताना दक्षता घ्यावी. गुरु वृषभ व् तूल राशीत असेल वा शुक्र धनु मीन राशीत असेल तर शक्यतो पांढरट पुष्कराज वापरावा. विशेष म्हणजे , कोणताही रत्न वापरताना तो ज्या कारणासाठी वापरत आहात तो ग्रह उत्तम कार्येश असेल तर चांगल्या प्रतीच रत्न घेण्यास हरकत नाही आणि जर तो ग्रह आवश्यक स्थान व् त्या विरोधी भावांचा कार्येश ही होत असेल तर ...कुंडली अभ्यासुन कमी प्रतिच् रत्न वापरण्यास हरकत नसते. रत्न हे चांगल्या प्रतीचे उत्तम दर्जेचे असावे.

मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९

सात मुखी रुद्राक्ष

!! श्री स्वामी समर्थ !!

ज्योतिष दिपक पिंपळे 9823448449
सात मुखी रुद्राक्षावर देवी लक्ष्मीचे अधिपत्य असते तर शनी हा शासक ग्रह आहे. त्यामुळे लक्ष्मी आणि शनी कृपाशील असे हे सात मुखी रुद्राक्ष आहे.
|| सप्त्वक्त्रो महेशानीहुयनंगो नाम नामत:
धारणiतस्य देवेशी दरिद्रोपीश्वरो भवेत् ||
शिवपुराण, अ २५,श्लो ७२
सप्त मुखी रुद्राक्ष हे अन्ग स्वरुचे असून हे धारण केल्यास दारिद्र नाहीसे होऊन ऐश्वर्यवान होतो असे शिवपुराणातील या श्लोकाचा अर्थ असून शनीचे अधिपत्य असल्याने हाडाच्या संबधित आजाराना फायदा देणार आहे. पायांचे आजार, मानेचे आजार तसेच गुढघ्याचे आजारी लोकांनी धारण करावा. लक्ष्मी स्वरूप असल्याने धन-धान्य याची वाढ होते. नौकरी आणि व्यासायिक लोकांना चांगला फलदायी आहे.

बुधवार, १७ जुलै, २०१९

**** स्वास्थ बंध ******

!! श्री स्वामी समर्थ !!
तीन मुखी रुद्राक्ष अग्‍नि देवाच स्‍वरूप मानल गेल आहे. याची देवता ही मंगळ असून हा शरीरातील energy level वाढविण्याचे
काम करतो, रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो, आणि आत्मबल निर्माण कुरून Immune level संतुलित ठेवतो.
|| त्रिमुखश्चैव रुद्राक्षो अप्यग्नित्रय स्वरुपक:
तध्दारणाच्च हुतयुक्तस्य तुष्यति नित्य: ||
श्रीमद् देवीभागवत अ. ६, श्लो. २६
५ मुखी रुद्रक्षावर गुरुच अधिपत्य आहे. त्यामुळे दोन ३ मुखी राद्रक्ष आणि तीन ५ मुखी रुद्राक्ष एकत्र केल्यास किंवा एक तीन मुखी आणि दोन ५ मुखी रुद्राक्ष जरी धारण केले तरी स्वास्थ बंध तयार होतो. Blood pressure कंट्रोल मध्ये राहते, जे मुले अथवा लोक depression/anxiety, diabetes यासारख्या आजारे त्रस्त आहे त्याच्यासाठी उपयुक्त आहे.
“ॐ क्लीम नमः” मंत्राचा जप करत करत धारण करावे.
**** वोटर थेरपी (Water Therapy)*****
तीन ५ मुखी रुद्राक्ष रात्री एक ग्लास पाण्यात ठेवून सकाळी ब्रश करण्याची अगोदर अनोशी पोटी घेतल्याने acidity व ईतर पोटाचे आजार कमी होतात. याचा अनुभव घ्या..
दिपक पिंपळे -९८२३४४८४४९
Image may contain: text

मंगळवार, १८ जून, २०१९

***सरस्वती बंध:******

!! श्री स्वामी समर्थ !!
४ मुखीचे दोन रुद्राक्ष आणि ६ मुखी एक रुद्राक्ष मिळून सरस्वती बंध तयार होते. विद्यार्थांना हे अतिशय फलदायी आणि अभ्यासात एकग्रता वाढवते. हे सर्व उपयांची उपयुक्तता तेव्हाच मिळणार ज्यावेळी कर्माची परीकाष्ठा आपण करणार. याचा प्रतिसाद (feedback) पालकांकडून चांगाला मिळाला आहे, जे विध्यार्थी हे बंध वापरत आहे, १०-१५% मार्कस आणि अभ्यासात वाढ दिसत आहे.
चार मुखी रुद्राक्ष हे ब्रम्हस्वरूप मानले आहे आणि शासक ग्रह हा बुध असून बुद्धीदायक गणेश देखील या रुद्राक्ष देवता मानली आहे. हे रुद्राक्ष धारण केल्याने एकग्रता, स्मरणशक्तीची वाढ होते आणि कुठल्याही शाखेतील शास्त्राच्या आभ्यास होण्यास मदत मिळते त्यामुळे विद्यार्थी, लेखक, कलाकार, पुरोहित यांना फलदायी आहे.
।।चतुर्वक्त्र: स्वयं ब्रह्मा यस्य देहे प्रतिष्टती
स भवेत्सर्वशास्त्रज्ञो द्विजो वेद विदा वर: ।।
पद्मपुराण अ ५७,श्लो ४८
चार मुखी ब्रम्ह आहे आणि हे धारण केल्यास चारही वेदाचे व इतर शास्त्राचे ज्ञान प्राप्त करू शकतो असे पद्म पुराणात संगीतले आहे

शनिवार, १ जून, २०१९

जातक हो…!! प्रश्न कुंडली ही फार महत्त्वाची..हं..!!!


!! श्री स्वामी समर्थ !!

मागील बऱ्याच लेखात मी प्रश्न कुंडलीचे महत्त्व सांगितले आहे आणि हरवलेल्या जातकाची केस देखील प्रश्न आणि जन्म कुंडलीने आपण पाहिली आहे की उत्तरला किती समीपता येते. लक्षात घेतले पाहिजे कि जन्मकुंडली हा जीवनाचा पूर्ण आराखडा आहे त्यात जन्मापासून ते मरणापर्यंत जीवनाच्या घटना दर्शवित असेतच मग विवाह, नौकरी, आथवा संतती याचा देखील आढावा घेता येतो. परंतु चालू जीवनात तत्कालीन प्रश्न उद्भवतात त्यावेळी केवळ प्रश्नकुंडलीच फार समीप उत्तर देऊ शकते.  २३ मे २०१९ रोजी मला एका पुणेस्थित जातकाने प्रश्न केला आणि प्रश्न कुंडलीची माहिती त्यांना असल्याने प्रश्नकुंडलीच मांडावी असे ते म्हणाले. हे ज्या क्षेत्रात काम करतात त्यात पूर्णत: अगदी १००% हे लेबरवर (कामगारावर) अवलंबून आहे आणि त्यांचे सर्व कामगार टीम साधारण दीड तो दोन महिन्यापासून सुटीवर होते, ती सर्व उत्तर भारतातील होती त्यांचा फोन-मोबिईल कुठलाच संपर्क होत नव्हता, आणि जातकाचे शिक्रापूर येथील काम हातातून जाईल अशी त्यांना भीती वाटू लागली, काम मोठ होत, १५ दिवस सुट्टी म्हणून गेलेले कामगार दीड महिना झाला तरी संपर्कात नाही म्हणून काळजी वाटू लागली आणि त्यांनी मला पुढील प्रश्न केला. (कुंडली आणि whatsapp चा त्यांचा feedback अभिप्राय देखील मी दिला आहे).



मुले वेळेत येऊन शिक्रापूर चे काम आपल्याला मिळेल ना ?  मुले नाहीत म्हणून हातातून जाणार नाही ना?”

प्रश्न होरारी tossing पद्धतीने नंबर #१०३ घेऊन, दि. २४/०५/२०१९ वेळ ९:५८:५१ रोजी, स्थळ: औरंगाबाद आणि प्रश्नकुंडली मांडली. कुंडलीत लेबर, नौकर, अथवा कामगार हे ६ व्या स्थानावरून पाहतात.
नियम: जर ६ भावाचा सब हा जर ६-१०-११ पैकीचा कार्येश असून याच भावाच्या दशा-अंतरदशेत हे कामगार कामावर रुजू होतील.

६ व्या भावाचा सव हा शनी (सेवाधारी) असून त्यचे बलवान कार्येश पाहूया.

SATURN* : -4  6  7   5(cuspal) (Conj-KET 4 (JUP 4 ))(Asp-RAH 10 (MER 9  2  11 ))
2-Star-Lord is VEN: 8  3
3-Sub-Lord is KET: 4 (JUP 4 ) 5(cuspal)  (Conj-SAT 4  6  7 )
4-Star-Lord of SubLord is VEN: 8  3


शनी हा २-६-१०-११ या सर्व भावांचा कार्येश आहे यामुळे लेबर लोक कामावर परततील हे सिद्ध झाले.

१० भावाचा (कर्म स्थान) सब गुरु आहे

JUPITER : -  4(cuspal)
2-Star-Lord is MER: 9  2  11 (Conj-SUN 9  1)
3-Sub-Lord is JUP:  4(cuspal) 
4-Star-Lord of SubLord is MER: 9  2  11 (Conj-SUN 9  1)

गुरु बुधाच्या नक्षत्रात २-११-१, २ (धन) १-११ (जातकाची ईछपुर्ति होणे) त्यामुळे जातकाचे शिक्रपुरचे काम जाणार नाही..हे हि निश्चित झाले, तर मग हे लेबर कधी येतील त्यासाठी दशा स्वामी पाहूया.
चंद्र-मंगळ-गुरु हि दशा २३-०५-२०१९ पासून ते ६-०६-२०१९ पर्यंत आहे.

चंद्र हा स्वतःच्या नक्षत्रात असून मंगळाच्या सब मध्ये आहे मंगळ -१० आहे आणि मंगळ आणि गुरु हे दोन्ही ग्रह २-६-१०-११ चे बलवान कार्येश आहेत त्यामुळे वरील कालावधीत लेबर येतील असे सांगितले आणि २८/०५/२०१९ रोजी ३ मुल आली आणि बाकीची सर्व मुले ४/६/२०१९ रोजी येणार आहेत असे त्यांनी कळविले. असे ग्रह-नक्षत्र एका ज्योतिषाला अडचणीत असणाऱ्या जातकाचा प्रश्न सोडविण्यास मदत करतात त्यातच स्वामी महाराज वाचेला साथ देतात हे हि त्रिवार सत्य...