बुधवार, १६ जानेवारी, २०१९

जे घडायचे होते तेच शेवटी घडले.....!!!!


!! श्री स्वामी समर्थ !!
सदर कुंडली ही पुरुष जातकाची आहे. या मुलाचे पालक माझ्याकडे पूर्वी पासून जन्मपत्रिका दाखवाण्यासाठी येतात आणि एक ज्योतिष म्हणून कुंडलीत जे आहे ते मला सांगणे हेच माझे कर्तव्य आहे. या जातकाचा डिसेंबर २०१८ रोजी विवाह मोडला आणि विवाह हा डिसेंबर २०१७ रोजी झाला होता. याची चाहूल एक ज्योतिष म्हणून आम्हाला होती याची ताकीद मी त्यांना दिली देखील मी कुंडली मिलन करता बऱ्याचवेळी मुलीच्या कुंडली गुणमिलन चांगले अगदी गुण २७, २१ आणि ३६ गुणाच्या कुंडल्या बाजूला काढून ठेवतो आणि दुसरे गुरुजी हो पुढे जाण्यासा हरकत नाही असे हे पालक सांगतात. या मुलाचे लग्न अजून एक ते दोन वर्ष करू नका असे मी सांगत होतो. परंतू मुलगा चांगला इंजिनिअर आहे नौकरी आहे, वय देखील वाढत आहे, मुली देखील येत आहे या कारणामुळे पालकांनी निर्णय घेतला आणि घडायचे तेच घडले. काही गोष्टी ह्या विधीलिखितच असतात हेच खर...!! एक ज्योतिष काही नकारात्मक बाबी कुंडलीत दिसत आहे हे ओरडून सांगत असतो, परंतू त्याचा दैव योगच तसा असतो आणि ती घटना घडते.



आता कुंडलीचा विचार करूया, या कुंडलीत ७ भावाचा सब हा शनी आहे. आणि शनी बुधाच्या नक्षत्रात आहे आणि बुध (नपुसक ग्रह) शुक्र (विवाह कारक) आणि प्लुटो (स्पोटक) पूर्ण युती योगात आहे. शनी आणि हर्शल युती युक्त आहे आणि हे दोन्ही ग्रह सप्तम (पती/पत्नी) स्थानला बघत (दृष्टी) आहे आणि सर्वात विध्वंसक योग म्हणजे शनी आणि प्लुटो ३७ डिग्री असे अंतर, अशा बर्याच कुंडल्यात विवाह मोडतात आणि या योगाच्या कुंडल्यांचा संग्रह माझ्याकडे आहे.  बुध अष्टमेश व्ययात (बेडरूम) शक्र-प्लुटो युक्त आहे त्यामुळे यांचे शयनकश स्थान बिघडले. शुक्राची महादशा नोव्हेंबर २०१५ सुरु झाली आणि शुक्र २-७-११ या भावांचा बलवान कार्यश झाला त्यामुळे विवाह होणार हे लिखित होते. शुक्र किती खराब झाला आहे हे मी वर सांगितले तसेच ७ भावाचा सब देखील कसा व्ययात बुधाच्या नक्षत्रात स्पोटक झाला हे देखील पाहिले. डिसेंबर २०१७ रोजी विवाह झाला त्यावेळी शुक्र-शुक्र-शनी ची दशा सुरु होती आणि अंतरदशास्वामी शनीचा प्रवेश नुकताच ऑक्टोबर २०१७ रोजी धनु राशीत झाला होता. आणि या मुलाच्या सुखस्थानी (द्वितीय स्थान) ११ अंशावर नेपचून हा फसवा ग्रह आहे. विवाह हा डिसेंबर २०१८ रोजी मोडला मुलगी एक महिन्याअगोदरच माहेरी निघून गेली. यावेळी शनी हा १५ अंशावर कुंडलीतील नेपचून वरून गोचर करीत होता केवळ ४ degree (फसवणूक) दर्शवितो, शुक्र-शुक्र-बुध हि दशा २३ डिसेंबर २०१८ पर्यंत होती आणि बुध कसा बिघडला हे वर सांगितलेच आहे तर दशास्वामी शुक्र यावेळी तुळ राशीत होता जो कि मुळ कुंडलीत देखील तूळ रास व्ययस्थानी आहे. असे ग्रह आणि असे परिणाम करतात. स्वामी महाराजांचे नाव घेऊन ज्योतिष मार्गदर्शन करतो आणि त्यांचे साथही मिळते हे देखील त्रिवार सत्य. त्यामुळे आपणस एकच सांगणे आहे गुण मिलानापेक्षा कुंडलीस महत्त्व द्यावे हे मी नेहमी सांगतो.
Preview


गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१८

गुरु प्रवेश - २०१८


!! श्री स्वामी समर्थ !!
अश्विन शु. ३ गुरुवार ११-१०-२०१८ रोजी सायंकाळी ७:२० वाजता गुरु वृश्चिक राशीत प्रवेश करीत आहे त्याचा पुण्यकाल गुरुवारी साय. ५:२९ ते ९:११ पर्यंत आहे. सध्या या social media मुळे नको ती भ्रांती लोकांमध्ये तयार झाली आहे, ठीक आहे ४, ८, १२ गोचारेने थोड्याफार प्रमाणत फळे देतो याचा अर्थ असा नाही कि सर्व काही नकारात्मक आहे. १२ वा गुरु असेल तर लग्न होत नाही, अडचणी येतात, वगेरे, हे अतिशय चुकीचे आहे. अशा भरपूर कुंडल्या आहेत ज्या लोकांना १२ गुरु असताना विवाह संपन्न झाला. त्यामुळे वर्तमान पेपर, न्यज चानेलच्या या कथाकाथीत ज्योतिषाच्या आहारी जाऊ नका. गुरूची सेवा करा, नामस्मरण करा, उपासना करा .. गुरु आपणस सशक्त बनवेल. कृपया ज्यांना आज पर्यत ११ वा गुरु सुरु आहे त्यांना तुम्ही विचारा... असा कुठला मोठा फायदा त्यांना गुरु ११ असताना करून देला..उत्तर समाधान कारक मिळणार नाही. मूळ कुंडलीत दशा महत्त्वाची असते ती चांगली असेत मग आपण ४-८-१२ असणारा गुरु देखील फायदा करून देणार यात शंका नाही.

सोमवार, १६ जुलै, २०१८

चार मुखी रुद्राक्ष


!! श्री स्वामी समर्थ !!
चार मुखी रुद्राक्ष हे ब्रम्हस्वरूप मानले आहे आणि शासक ग्रह हा बुध असून बुद्धीदायक गणेश देखील या रुद्राक्ष देवता मानली आहे. हे रुद्राक्ष धारण केल्याने एकग्रता, स्मरणशक्तीची वाढ होते आणि कुठल्याही शाखेतील शास्त्राच्या आभ्यास होण्यास मदत मिळते त्यामुळे विद्यार्थी, लेखक, कलाकार, पुरोहित यांना फलदायी आहे.

।।चतुर्वक्त्र: स्वयं ब्रह्मा यस्य देहे प्रतिष्टती
स भवेत्सर्वशास्त्रज्ञो द्विजो वेद विदा वर: ।।
पद्मपुराण अ ५७,श्लो ४८

चार मुखी ब्रम्ह आहे आणि हे धारण केल्यास चारही वेदाचे व इतर शास्त्राचे ज्ञान प्राप्त करू शकतो असे पद्म पुराणात संगीतले आहे.

ब्रेन समन्धित आजारावर उपयुक्त असून शोर्ट-मेमरी किंवा नूरोलोजी समन्धित आजार दूर होतात. फोकस आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. अध्यात्मिक दृष्टीकोनातून पाहता शारारतील ७ चक्र जागृत होतात. ३२ रुद्राक्ष माळ ४ मुखी घातल्यास एक चक्र पूर्णत्व पावते आणि त्याचे स्पंधणे कंट्रोल होतात.

सरस्वती बंध:  ४ मुखीचे दोन रुद्राक्ष आणि ६ मुखी एक रुद्राक्ष मिळून सरस्वती बंध तयार होते. विद्यार्थांना हे अतिशय फलदायी आणि अभ्यासात एकग्रता वाढवते. हे सर्व उपयांची उपयुक्तता तेव्हाच मिळणार ज्यावेळी कर्माची परीकाष्ठा आपण करणार.
!! शुभम भवतु !!


गुरुवार, ५ जुलै, २०१८

दोन मुखी रुद्राक्ष

श्री स्वामी समर्थ
मागील लेखात आपण एक मुखी रुद्राक्षाची माहिती पाहिली आज दोन मुखी रुद्राक्षाच महत्त्व पाहूया. दोन मुखी रुद्राक्षामध्ये साक्षात शिव आणि पार्वतीचा निवास असतो. हे धारण केल्यानंतर तुम्ही आपल्या सगळ्या अडचणी, समस्या देवावर सोडा देवच तुमची बिगडलेली काम सावरतील. दोन मुखी रुद्राक्ष यासाठी देखील खास आहे कारण हे धारण करणाऱ्या व्यक्तीला शिव आणि शक्‍तिचा एकत्र आशीर्वाद मिळतो.

|| द्विवक्त्रस्तु मुनिश्रेष्ठ अर्धनारीश्वरो भवेत ||
श्रीमद् देवीभागवत अ. ७, श्लो. २४

2 मुखी रुद्राक्ष पेंडेंटचे लाभ: वैवाहिक जीवनाला सुखी बनवण्या साठी दोन मुखी रुद्राक्ष अत्‍यंत लाभकारी आहे. घर-परिवारात शांती राहते आणि कर्जापासून मुक्‍ति मिळते तसेच मान-सन्मानात वाढ होते. कर्क रास असणाऱ्या व्यक्तीसाठी दोन मुखी रुद्राक्ष अत्‍यंत उत्‍तम असते.
शारीरिक लाभ: डिप्रेशन, नरर्वौसनेस, चेस्टपेन, खोकला यापासून मुक्तता प्राप्त करून देते तर मनाची एकग्रता वाढविते. पुरुषांना प्रोस्टेट तर स्त्रियांना गायनिक (OB-GYN) अशा आजारापासून लवकर बर होण्यास मदत करते. याचा बीज हे ‘ॐ नम:’ आपणस कुणास पाहिजे असल्यास संपर्क करू शकता. माझ्याकडे केवळ एकच उपलब्ध आहे ते देखील
certification सहित

सोमवार, २ जुलै, २०१८

एक मुखी रुद्राक्ष


श्री स्वामी समर्थ 
मागील पोस्ट मध्ये जोतिष हा कुठल्या आधारे रत्न, रुद्राक्ष, उपासना सांगतात असे मी सांगितले तर आज आपण एक मुखी रुद्राक्षाचा पुराणातील संधर्भ आणि त्याची उपयुक्तता पाहूया. एक मुखी रुद्राक्षास शास्त्रात प्रत्यक्ष शिव स्वरूप मानले आहे. एक मुखी धारण केल्यास सर्व पापांपासून मुक्तता होऊन जन्म-मारण्याच्या फेर्यातून मुक्त करणारा आहे. 
।। एकवक्त्र: शिव: साक्षाद्भुक्ति मुक्ति फल प्रद: ||
शिवपुराण अ. २५, श्लो. ६४
या रुद्राक्षाला सर्वात अधिक कल्‍याणकारी आणि महत्‍वपूर्ण मानल गेल आहे. पूर्ण ब्रह्मांडाच्या कल्‍याणकारी वस्तूं मध्ये एकमुखी रुद्राक्ष नाव सर्वप्रथम घेतलं जात. याची देवता मुळातच शिव आहे आणि शिव हे प्रथम आदियोगी असल्याने योगसाधनेला उपयोगी ठरणारा आहे. रुद्राक्षचे असे फारसे नियम नाही परंतू एक मुखी धारण करण्यासाठी कसोटीला उतरणे फार गरजचे असते त्यामुळे या रुद्राक्षाचे देवघरात पूजन जास्त योग्य आहे. रोज रुद्राभिषेक किंवा ‘ॐ नमः शिवाय’ या पंचाक्षरी मंत्राचा अभिषेक करावा. नेपाळमध्ये जो एक मुखी रुद्राक्ष पाहण्यात येतो तो फारच दुर्मिळ असून १२ वर्षानंतर एकदाच तयार होतो आणि आपण जे मार्केट मध्ये पाहतो ते ‘अर्धचंद्राकार’ किंवा काजूच्या आकाराचा हा रुद्राक्ष पाहतो त्याची प्राप्ती दक्षिण भारत किंवा इंडोनेशिया मध्ये जास्त प्रमाणात होते.
कसा वापर करावा:
एक एकमुखी रुद्राक्ष धारण करण्याचा मंत्र आहे “ॐ ह्रीं नमः” आणि शिवचा पंचाक्षर बीज मंत्र आहे “ॐ नमः शिवाय” दोनीही मंत्रा पैकी एक मंत्राच उच्‍चारण करून एकमुखी रुद्राक्ष धारण केल जावू शकत. हे लक्षात ठेवा की नियमित पंच माळेचा “ॐ नमः शिवाय” मंत्राचा जप केल्यानी याचा प्रभाव किती तरी पटीने वाढतो.
एकमुखी रुद्राक्ष लाभ : तणाव (स्ट्रेस) कमी होणे, डोळ्यांचे, रक्तदाब, आणि हृदय विकार सारख्या आजारावर उपयुक्त असा आहे. - आपणस एक मुखी प्राप्त करायचे असल्यास संपर्क करू शकता.



Preview