शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१३

* कुलदेवता *

!! श्री स्वामी समर्थ !! 
आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते, अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. तिलाच कुलदेवता म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी, त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास जलद पद्धतीने प्रगती होते.
कुलदेवतेचा नामजप करणे

कुलदेवता या शब्दाचा अर्थ !

'
कुलदेवता' हा शब्द कुल' आणि देवता' या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधारचक्रातील कुंडलिनीशक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता. कुलदेवता ज्या वेळी पुरुषदेवता असते, त्या वेळी तिला कुलदेवआणि जेव्हा ती स्त्रीदेवता असते, तेव्हा तिला कुलदेवीम्हणून संबोधले जाते.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेली उपासना !
शिवाजी माहाराजांना आशीर्वाद देतांना त्यांची कुलदेवता
शिवाजी माहाराजांना आशीर्वाद देतांना त्यांची कुलदेवता

कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवी.

कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व !

ब्रह्मांडात असलेली सर्व तत्त्वे पिंडात आली की, साधना पूर्ण होते. श्रीविष्णु, शिव आणि श्री गणपति यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्त्व वाढते; परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्त्वांना आकर्षित करण्याचे आणि त्या सर्वांची ३० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे सामर्थ्य केवळ कुलदेवतेच्या जपात आहे. त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वीतत्त्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही. ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील, त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा.

कुलदेवता ठाऊक नसल्यास काय करावे ?

कुलदेवता ठाऊक नसेल, तर श्री कुलदेवतायै नमः ।' असा नामजप करावा. हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारे कोणीतरी नक्कीच भेटते. सनातन संस्थेच्या अनेक साधकांनी ही अनुभूती घेतली आहे. श्री कुलदेवतायै नमः ।' हा जप देवतेच्या तारक तत्त्वाशी संबंधित असल्याने कुलदेवता' या शब्दातील दे' हे अक्षर उच्चारतांना थोडेसे लांबवावे. यामुळे देवतेचे तारक तत्त्व जागृत होऊन त्या तत्त्वाचा आपल्याला लाभ होतो.

मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०१३

नोव्हेंबर २०१३, ग्रहांचे नक्षत्र भ्रमण

 !! श्री स्वामी समर्थ !!
  
नोव्हेंबर २०१३
  
ग्रह          ग्रह-राशी प्रवेश      नक्षत्र स्वामी               दिनांक
रवि           १६/११/१-वृश्चिक         राहू                         १/११/१३ ते ६/११/१३
                                  गुरु                         ७/११/१३ ते १९/११/१३
                                  शनी                        २०/११/१३ ते ३०/११/१३

मंगळ          २६/११/१३-कन्या        शुक्र                         १/११/१३ ते २०/११/१३
                                  रवि                         २०/११/१३ ते ३०/११/१३

बुध           तुळ                  राहू                         १/११/१३ ते २४/११/१३
                                  गुरु                         २५/११/१३ ते ३०/११/१३

शुक्र           धनु                  केतू                         १/११/१३ ते १३/११/१३
                                  शुक्र                         १४/११/१३ ते २९/११/१३

 ग्रह         ग्रह-राशी प्रवेश      नक्षत्रस्वामी-सब             दिनांक

गुरु           मिथून                गुरु-केतू                      १/११/१३ ते २८/११/१३
                                  गुरु-बुध                      २९/११/१३ ते ३०/११/१३

शनी           तुळ                  राहू-मंगळ                    १/११/१३ ते ४/११/१३
                                  गुरु-गुरु                      ५/११/१३ ते १८/११/१३
                                  गुरु-शनी                     १९/११/१३ ते ३०/११/१३

राहू           तुळ                  राहू-बुध                      १/११/१३ ते १८/११/१३
                                   राहू-शनी                     १९/११/१३ ते २९/११/१३ 

केतू           मेष                  शुक्र-शुक्र                     १/११/१३ ते ४/११/१३

                                  केतू-बुध                      ५/११/१३ ते ३०/११/१३
Preview

शनिवार, २ नोव्हेंबर, २०१३

नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन

!! श्री स्वामी समर्थ !!
!! श्री लक्ष्मीमाता  प्रसन्न !!

नरक चतुदर्शी हा दिवस नरकासुराच्या वधाचा आनंदोत्सव म्हणून साजरा होतो. या दिवशी श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामेने स्त्रियांना पिडा देणार्याा नरकासुराचा वध केला. पण मरताना नरकासुराने वर मागितला की, या दिवशी अभ्यंगस्नान करणार्याास नरकाची पिडा देऊ नये. श्रीकृष्णाने उदारमनाने त्याला हा वर देऊ केला. म्हणूनच या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व आहे. या दिवशी सुर्योदयापूर्वी स्नान केल्यास अपमृत्यू आणि दुर्दैवापासून सुटका होते असा समज असल्याने या दिवसापासून अभ्यंगस्नानाला सुरूवात केली जाते. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नानानंतर अपमृत्यू निवारणार्थ यमतर्पण केले जाते. हा संपूर्ण विधी पंचागात दिलेला असतो. या दिवशी आई मुलांना औक्षण करते. काही ठिकाणी नरकासूर वधाचे प्रतिक म्हणून कारीट पायाने ठेचून उडवतात, तर काही जण त्याचा रस (रक्त) जिभेला लावतात. अभ्यंग स्नानानंतर कपाळाला टिळा लावून देवदर्शनास जाण्याचा प्रघात आहे. या दिवशी सायंकाळी घर, दुकान कार्यालय आदी ठिकाणी दिवे प्रज्वलित केले जातात. घराचे अंगण रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजवले जाते. केवळ लहान मुलेच नव्हे तर तरुण, प्रौढ असे सारेजण ङ्गटाके वाजवून येणार्याे नवीन पर्वाचा आनंदाने स्विकार करतात. या दिवशी नवीन वस्त्र परिधान करून येणार्याव लक्ष्मीचे स्वागत केले जाते. 

थोडक्यात नरक चतुदर्शीच्या दिवशी अलक्ष्मीचे मर्दन करून, आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट करून, अहंकाराचे उच्चाटन करून शुचिर्भूत व्हायचे असते. आजच्याच दिवशी लक्ष्मीपूजनाचाही योग आला आहे. सामान्यत: अमावस्या हा दिवस अशुभ मानला जातो. पण याला आश्वििन अमावस्येचा अपवादर आहे. कारण ही अमावस्या शुभ ङ्गलदायी आहे. शिवाय ती चंचल असणार्याव लक्ष्मीला स्थिर करणारी आहे. म्हणूनच स्थिर लग्नावर लक्ष्मीचे पूजन केले जाते. आपल्याकडे लक्ष्मी कायम रहावी, तिची चंचलता संपुष्टात यावी हा यामागचा हेतू आहे. या दिवशी अनेक घरात श्रीसुक्ताचे पठण केले जाते. या दिवसाची आख्यायिका मोठी रंजक आहे. या दिवशी बळीराजा पाताळात गाडला गेला आणि त्याच्या तावडीतून सर्व देवतांची सुटका झाली. शिवाय लक्ष्मीचे वर्चस्व अबाधित राहिले. याची आठवण म्हणून लक्ष्मीपूजन केले जाते. 

हा दिवस व्यापारी लोक विशेष उत्साहाने साजरा करतात. त्यांच्या पूजेचा दिमाख पाहण्याजोगा असतो. सायंकाळी नवीन वस्त्रावर रांगोळी रेखून तबक ठेवले जाते. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रूपया, आपल्याकडील मिळकतीची कागदपत्रे, खतावण्या, वह्या आदी ठेवले जाते. या सर्वांची ङ्गुले, ङ्गळे, हळद-कुंकू, नैवेद्य, अक्षता आदींद्वारे विधीवत पूजा केली जाते. देवीला प्रसन्न करण्यासाठी पक्वानांचा नैवेद्य दाखवला जातो. साळीच्या लाह्या, बत्तासे, अनारसे, डाळींबाचे दाणे, पंचामृत अशा पारंपरिक पदार्थांनी देवीला तुष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. या दिवशी लक्ष्मीबरोबरच घरातील केरसुणीलाही पूजेचा मान असतो. घर स्वच्छ करणारी केरसुणी उत्सवमूर्ती असते. तिची देखील पाणी, हळदकु ंकु, ङ्गुले, हार आदींनी पूजा केली जाते आणि नंतरच तिचा वापर करणे सुरू होते. लक्ष्मीबरोबरच कुबेराचेही पूजन केले जाते. संध्याकाळी ङ्गटाक्यांच्या दणदणाटात लक्ष्मीचे स्वागत होते. शेजार्या्-पाजार्यांेना बोलावून, त्यांना ङ्गराळाचे पदार्थ देऊन हा दिवस थाटामाटात साजरा केला जातो. याच दिवशी संध्याकाळी आणखी एक पूजाविधी संपन्न होते तो म्हणजे यमराज पूजन आणि यमदीपदान. यासाठी घररातील स्त्री एका पात्रामध्ये तिळाच्या तेलाचे दिवे लावते. या दिव्यांची गंध, पुष्प, अक्षता यांनी पूजा केली जाते. दक्षिणेकडे तोंड करून यमाची प्रार्थना केली जाते. त्यानंतर हे सर्व दिवे सार्वजनिक ठिकाणी ठेवले जातात. त्यापैकी एक दिवा दाराच्या उंबरठ्यावरती अखंड तेवत ठेवला जातो. अशा प्रकारे विधी केल्यास यमाच्या पाशातून आणि नरकातून मुक्ती मिळते असा समज आहे. याखेरीज यमासाठी पिठाचा दिवा बनवून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरही लावला जातो. या दिव्याची देखील तांदूळ, गूळ, पाणी, ङ्गुले, नैवेद्यासह पूजा केली जाते. अशा प्रकारे यमराज पूजन संपन्न होते. अकाली मृत्यूदोष आणि पिडा टाळणे हा या विधीच्या आयोजनामागचा उद्देश आहे. या दिवशीचा मुख्य नैवेद्य धने आणि गुळाचा असतो. काही ठिकाणी कडूलिंबाची पाने आणि गूळ देखील नैवेद्य म्हणून देवापुढे ठेवतात. कडूलिंबाचे आयुर्वेदातील महत्त्व सर्वांना ठाऊकच आहे. रक्तशुद्धी करण्याबरोबरच एकूण प्रकृती स्वाथ्यासाठी कडू

लेख सौजन्य :  श्री प्रशांतजी कुडाळकर