मंगळवार, २१ मे, २०१९

हरवलेले व्यक्ती सापडेल का ? जन्म कुंडली विवेचेन – भाग २


!!श्री स्वामी समर्थ!!
मागील भागात याच जातकाची प्रश्न कुंडलीवरून जातक सापडेल आणि जीविताला धोका आणि मृतदेह घरातील मागील परिसरात पाण्याच्या डबक्यात मिळाला, या सर्व घटना प्रश्न कुंडलीत तंतोतंत दर्शवित होत्या त्याचे विवेचन देखील भागिल भागात प्रश्न कुंडलीत केले आहे. जातकाच्या जन्म कुंडलीचा तपशील प्राप्त झाला आहे. मी जातक सापडेल कि नाही हा प्रश्न केवळ मात्र प्रश्न कुंडलीने सोडविला आहे, जन्म कुंडलीने नाही, हे येथे नमूद करू ईच्छितो, अशा काही प्रश्नांना प्रश्न कुंडलीची साथ मिळत असते, तत्कालीन प्रश्न हे प्रश्न कुंडलीवरून सोडवण्यात समीपता आणि यश मिळते. या जातकाचा जन्म कुंडली हि दिलेल्या तपशिलानुसार मी तयार केली, जातक अल्पआयु आहे, जीवनातील हि घटना याचा आढावा पाहूया.
जन्म तारीख: १४/०८/१९८८, जन्म वेळ: ०२:४५ जन्म स्थळ: ७३’ पू ९’’/ १९’ उ १५’’
प्रथम आयुष्यामानाचे काही नियम पाहूया.
लग्न भावाचा (प्रथम भाव) सब हा १-५-९-११ या भावाचा कार्येश असेल तर जातक हा दिघार्युषी असतो, जर हा सब २-६-७-८-१२ या भावाच्या कार्येश असून मारक आणि बाधक स्थानाचा (लग्नात चर राशी – ११ स्थान/स्थिर राशी – ९ स्थान/द्विस्वभावी – ७ स्थान बाधक स्थान असते) कार्येश असेल तर जातक हा अल्पायुषी असतो आणि मारक भाव हे २ आणि ७ आहेत. वरील सांगितलेल्या दोन्ही समान भाव दर्शवित असेल तर तो मध्यायु असतो. शास्रतात ३३ वर्षे अल्पायु आणि ६६ वर्षाच्या वर जगाला तर त्यास पूर्णआयु सांगितले आहे. असे काही नियम आहेत.
पुन्हा मी आपणास सांगू ईच्छितो तो की कधीहि आयुष्यमानाचे प्रश्न ज्योतिषाला विचारू नये केवळ अति संकटाच्या वेळी आथवा बिकट परस्थितीमध्येच हे पाहावे लागते याचे कारण जातकाचे आयुष्याची डोर हि कर्म, प्रारब्ध, संचित आणि भोग यावर अवलंबून असते आणि त्याची परीपक्व फलित तो परमेश्वर परमात्मा देत असतो. “परमेश्वरा मला आता उचल..!!” असे म्हणारे अंथरूणावर पडलेले असतात पण तो काही नेत नाही कारण त्याच भोग सरलेले नसतात. त्यासाठी सत्कर्म करावे, असो... आपण कुंडलीकडे वळूया...!!


या जातकाच्या कुडलीत लग्न भावाचा सब हा गुरु आहे त्याचे बलवान कार्येश पाहूया..
PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- 12 7 10 Cusp Yuti: (12)
It's N.Swami :-------- Sun:- (2) 3 Cusp Yuti: (3)
It's Sub :------------ Venus:- 1 5 12 Cusp Yuti: (1) Mars-Drusht 10 6 11
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (9) Rashi-Swami Saturn (6) (8) 9
Itself aspects :------ 6 4 8
या ठिकाणी गुरु हा रवी च्या नक्षत्र २ (मारक) ३ (अष्टामाचे ८ वे स्थान-संकट), आणि गुरु १२ स्थानी (मोक्ष स्थानी – अंतिम) तर गुरु सप्तमेश (बाधकेश असून येथे धनु रास (शनी+नेपचून+हर्शल) आहे आणि शनी (कर्म) ६-८ (आयुष्याला धोका) या सर्व भावांचा बलवान कार्येश/एकूण १-२-६-८-१२ या भावाचा बलवान कार्येश झाला आहे त्यामुळे जातक हा अल्पायु आहे असे प्रथम दर्शनी दिसते.
आयुष्याला धोका/अपघात अथवा संकट यासाठी ८ स्थान पाहावे लागते. या कुंडलीत अष्टम साथांचा सब हा शनी आहे. शनीचे बलवान कार्येश ग्रह पाहूया
PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- (6) (8) 9
It's N.Swami :-------- Ketu:- (3) Rashi-Swami Sun (2) 3
It's Sub :------------ Venus:- 1 5 12 Cusp Yuti: (1) Mars-Drusht 10 6 11
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (9) Rashi-Swami Saturn (6) (8) 9
Itself aspects :------ 1 9 4
येथे शनी एकमात्र असा ग्रह आहे जो जीवाला धोका दर्शवित आहे. पहा शनी १ भावार (जातक स्वत:) दृष्टी, तो धनुला असून ६ भावात आहे आणि या ठिकाणी वृश्चिक रास(पाणी साचलेले डबके) हि रास आहे, अष्टम स्थानावरून जातकाचा मृत्यू कसा होईल हे देखील कळवते आणि शनी अष्टमेश (धोका/संकट) आहे. त्यामुळे शनी आहे २-३-६-८ या आयुष्याच्या नकारात्मक भावाचा कार्येश झाला.
आपण आयुष्यमान पहिले, ८ स्थानावरून आयुष्याचा धोका देखील पहिला तर मग आता हि घटना घडली याचा विचार आपण दशास्वामी वरून करूया. यावेळी जातकाला चंद्र–शनी–शनी दशा १४/४/२०१९ ते १५/०७/२०१९ पर्यंत होती. शनी किती आयुष्याला धोका दायक आहे, वर संगीतलेच आहे. आता महादशा स्वामी चंद्र (पाणी तत्त्व) पाहूया:
PLANET : MOON
Itself :-------------- Moon:- (3) 2 Mercury-Yuti (3) 1 (4)
It's N.Swami :-------- Ketu:- (3) Rashi-Swami Sun (2) 3
It's Sub :------------ Mercury:- 3 1 4 Moon-Yuti 3 2
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (3) Rashi-Swami Sun (2) 3
येथे चंद्र देखील ३ (८ चे ८ वे स्थान) २ (मारक) ४ (अंतिम चिरशांती) या भावाचा बलवान कार्येश असून, चंद्र केतूच्या नक्षत्रात असून ३ स्थानी चंद्र आणि केतू ग्रहण योगात आहे आणि जातक हा ३/५/२०१९ सायंकाळी घरातून निघून गेले त्यावेळी अमावास्या सुरु होती दुसऱ्या दिवशी शनी अमावास्याच होती आणि जातक हा मंगळवारी दि. ७/०५/२०१९ रोजी घराच्या मागील भागातील साचलेल्या पाण्याच्या डबक्यात त्याचे शव सापडेल या दिवशि रोहिणी नक्षत्र म्हणजेच चंद्राचे नक्षत्र होते. घटनेच्या वेळी गोचारेने चंद्र, रवी किंवा दशास्वामी हे दशास्वामी ग्रहांच्या नक्षत्रात भ्रमण करतात हा नियम देखील कुंडलीत येथे सिद्ध होतो. असे ग्रह, नक्षत्र, आणि राशी मनुष्य जीवनाचा आराखडा सांगतात, बाकी ज्योतिष शास्त्र थोतांड आहे असे म्हणार्यांना अजून काय सिद्द करून दाखवावे. असो....!! नमो नारायण !!

सोमवार, १३ मे, २०१९

“हरवलेली व्यक्ती परत घेईल का (सापडेल का)?....!!!”


श्री स्वामी समर्थ

मागील रविवारी दि. ०५ मे रोजी सकाळी ७ वाजता फोनची रिंग वाजली, माझी स्वामी मठात पूजेची तयारी सुरु होती, खूप अर्जंट आहे व्यक्ती घरातून ३ मे पासून घरातून निघून गेली आहे आणि आपण प्रश्न कुंडली मांडावी आणि त्या व्यक्तीच्या पत्नीने एक होरारी नंबर पाठविला आहे तो देखील मी पाठविला आहे असे तो म्हणाला त्यास मी पूजा आरती झाल्यावर ऑफस मध्ये गेलो कि प्रथम आपली कुंडली मांडून कळवतो असे सांगितले. हा फोन मुंबई येथून होता.

ऑफिस मध्ये आल्यावर कॉम्पुटर सुरु केले आणि प्रथम कुंडली मांडली, हरवलेल्या व्यक्तीच्या पत्नीने ५० हा नंबर दिला, त्यानुसार कुंडली मांडली आणि ७ स्थान (पतीचे स्थान) फिरवून कुंडली (लग्न भाव) तयार केली आणि तीच कुंडली पुढील प्रमाणे आहे.

प्रश्न कुंडली: ५ मे २०१९, रविवार, वेळ: १०:४२:१३, स्थळ: औरंगाबाद, होरारी न. ५०
रूलीग प्लानेट: रवी, मंगळ शुक्र, गुरु, राहू, केतू

नियम:  हरवलेल्या व्यक्तीच्या लग्न भावापासून २-४-११ या भावापैकीचा कार्येश ग्रहाच्या दशा-अंतरदशेत व्यक्ती परत येते.

वरील नियमा व्यतिरिक्त जातकाच्या आयुष्याला काही धोका आहे का, तर अशावेळी लग्न भावाचा सब मारक/बाधक भावाचा कार्येश आहे किंवा नाही हे पाहून तो व्यक्ती जीवित अथवा मृत आहे आहे याचा देखील आढावा घ्यावा लागतो, मंगळ संबध असेल तर पोलिसांची मदत घ्यावी लागते हे सर्व काही पाहावे लागते आणि कुंडलीचा आधार घेऊन अंतिम निष्कर्श येवून उत्तर सोमोरील व्यक्तीस सांगावे लागते. हे नियम पाहूया या कुंडलीत.



कुंडलीत ७ भाव लग्नी मांडला आहे कारण पत्नीने प्रश्न विचारला आहे. या कुंडलीत १ भाव (जातक) आणि ८ भावाचा (धोका, संकट) सब (उपनक्षत्र स्वामी) हा बुध आहे आणि आत बुधाचे बलवान कार्येश ग्रह पाहूया.

० बुध:
केतू: १ (गुरु १२) (यु.शनी १, २, ३) (मंगळ दृ ६)
० रवी:
शुक्र:  ४ ११

एकूण: १-२-३-६-१२ आणि ४-११

बुध हा १ (हरवलेला जातक), १२ (लांब दूर, इस्पितळात, मंदिर), २ (मारक स्थान) ३ (८ चे ८ स्थान) मंगल ६ (पोलिसांचा आधार घेणे) आणि शुक्र मुळे ४ आणि ११ भावाचा कार्येश झाला त्यामुळे जातक हे सापडेल हे निश्चित झाले.

तसेच बुध हा सप्तमेश (बाधक) असून त्यात राहू देखील आहे याचाच अर्थ बुध हा १-२-७-६-१२ या भावाचा कार्येश असल्यामुळे जातकाच्या जीवाला धोका आहे आणि मंगळाचा संबध असल्याने पोलिसाचा आधार घ्यावा लागतो, दुय्यम कार्येश सब रवी हा ९-५ चा कार्येश असल्याने एक आशेचा किरण म्हणजे जातक जीवत आहे असे दर्शविते, आम्हाला अशा महत्वाच्या गोष्टीत एकदम अंतिम निर्णय घेता येत आणि जरी कुंडली पूर्णत: जीवाला धोका दर्शवित असली तरी ५-९ मुळे जातक कदाचित सुरक्षित आहे असे मी समोरील प्रश्न विचारलेल्या व्यक्तीस कळविले आणि दशा स्वामी काय सांगतो याचा विचार केला, तर प्रश्न हा भरणी नक्षत्रात विचारला, त्याचा स्वामी शुक्र आणि शुक्र चतुर्थी स्थानी (घरी घेईल/सापडेल), मीन रास या ठिकाणी (जल तत्वाची रास), शुक्र बुधाच्या नक्षत्रात आहे, बुध चतुर्थात, सप्तमेश (बाधक स्थान), दशमेश (११ चे व्यय) आणि हा शुक्र मंगळाच्या सब मध्ये आहे मंगळ ६ (पोलीस आधार), १२ व्या स्थानाचा अधिपती (हॉस्पिटल, धोका) आणि वृश्चिक रास (साचलेला डबके अथवा गटार) असे दर्शवितो कि दशा देखील पूर्णत: नकारात्मक झाली आहे जातकाच्या जीवाला धोका आहे हे मात्र आता निश्चीत वाटत होते. तरी देखील रुलिंग प्लानेटचा आधार घेऊन समोरील व्यक्तीस आपण पोलिसांची मदत घ्यावी आणि जातक हे मंगळवार ते शुक्रवार पर्यंत सापडतील असे संगीतले, ५-९ भावामुळे ते कदाचित जीवित असतील असे हि सांगितले. परंतू प्रश्न कुंडली अगदी बरोबर सांगत होती, जातकचा मृतदेह मंगळवारी सूर्यास्तापूर्वी त्यांच्याच घरातील मागच्या बाजूच्या डबक्यात तरंगत होता आणि पुढील तपास हे पोलीस करती आहेत.
याच कुंडलीत अजून खूप बारकावे आहेत विचार केला तर प्रत्यक घटनेचे उत्तर मिळते असो कधी कधी कुंडलीत नकारात्मक गोष्टी दिसत असल्यातरी समोरील व्यक्तीस सांगण्याचे धाडस होत नाही, खूप विचार करून समर्पक उत्तर द्यावे लागते. हरवलेल्या व्यक्तीची जन्म कुंडली तपशील प्राप्त झाला आहे, पुढील भागात जन्म कुंडलीचे विवेचण पाहूया...!!! ॐ शांती !!!






मंगळवार, ७ मे, २०१९

मंगळाचा मिथून राशीत प्रवेश


श्री स्वामी समर्थ 
आज दि. ७ मे २०१९ रोजी मंगळाचे राशी परिवर्तन सकाळी मिथुन राशीत झाले आणि मंगळ आणि राहू हा अंगारक योग असून शनी-केतू ची देखील दृष्टी आहे. या योगाचा १२ राशीवर निश्चितच परिणाम होणार आहे. २२ जून पर्यंत आहे मंगळ हा मिथून राशीत आहे. याचा परिमाण भौतिक दृष्ट्या देखील होणार आहे. गर्मी वाढेल कारण मंगळ उष्णतेचा कारक, पाण्याचे संकट निर्माण होतील तर शनी दृष्टी युक्त असल्याने राजनैतिक उलथा-पालथ देखील होणार आहे आणि याचा परिणाम आपण २३ मे रोजी पाहणारच आहोत. मंगळ हा शत्रू राशीत आहे आणि शत्रू ग्रहा बरोबर म्हणजेच राहू बरोबर अंगारक योग करीत आहे. त्यामुळे १२ राशीला तो वेग वेगळा परिणाम देणार ठरेल.

मंगळाचे गोचर राशी फळ
मेष:- मेष राशीतील तिसरा मंगळ हा भावंडात वाद निर्माण करणारा ठरेल तर वाहन सावकाश चालवणे योग्य ठरेल. संपत्ती बाबत सावधान राहा, फसवणूक होऊ नये.

वृषभ : या राशीला दुसरा मंगळ हा, कोर्ट आणि कचेरीत आपण विनाकारण ओढले जाऊ शकता. पैसे उधार देऊ नका. धर्याने काम करा.

मिथून : याच राशीत मंगळ-राहू हा अंगारक योग आहे, कर्ज वाढेल, संध्याकाळी प्रवास टाळावा. मानसिक तणाव देखील वाढेल, वडिलांशी वाद होतील. त्यामुळे आपण शांत राहणे योग्य राहील.

कर्क : मंगळ या राशीला १२ राहणार आहे. वाहनासाठी आणि घर कामासाठी पैसा खर्च होईल. नियमाचे पालन करा नाही तर कानुनी पेचात अडकाल.

सिंह:  ११ वा मंगळ आपणास अचानक धन लाभ करून देऊ शकतो मग शेअर असो अथवा लॉटरी मार्फत असो ते धन प्राप्त होईल. मित्रांनावर विश्वास ठेवू नका.

कन्या: १० वा मंगळ कामाची दग-दग वाढेल आणि पैसे हि कमी मिळतील केवळ ढोर महिनत होणार आहे.

तुला: ९ वा मंगळ भाग्याला साथ मिळेल. यात्रेचा योग येईल.  मोठी कामे मार्गी लागणार आहेत.  लांबचे प्रवास देखील होतील. परदेश जाण्याचे योग आहेत.

वृश्चिक: ८ वा मंगळ या राशीला अशुभ फळे देणारा ठरेल. सावधान राह, आर्थिक आणि मानसिक हानी होणार आहे. त्यामुळे सतर्क रहा.

धनु: ७ वा मंगळ पती-पत्नी मध्ये वाद निर्माण होऊ शकता. संशयाचे वातावरण तयार होऊन गैरसमज वाढणार आहे. प्रेमात वाद निर्माण होतील, वेळ सावधान राहण्याची आहे.


मकर:  ६ वा मंगळ रोग वाढवू शकतो. शत्रू हे हवी होणार आहेत. सत्याने वागा पुढे परिणाम चांगले मिळतील. रोगाचे निदान लावर होणार नाही. काळजी घ्या.

कुंभ:  ५ वा मंगळ हा नौकरीत समस्या निर्माण करू शकतो, उत्त्पन्न कमी होईल, मुलांच्या स्वथाकडे लक्ष्य द्यावे लागेल.

मीन : ४ था मंगळ आईची काळजी घावी. सुखात कमतरता येईल. घरात वाद टाळा.  चिंता वाढणार आहे. विवाद होणार नाही याची देखील काळजी घ्या.

ज्योतिषकार: श्री दिपक चंद्रकांत पिंपळे / ९८२३४४८४४९