रविवार, २७ जानेवारी, २०१३

प्रश्नकुंडलीस जन्मकुंडली एवढेच महत्त्व (ठाणे ज्योतिष संमेलन)

|| श्री स्वामी समर्थ ||

नमस्कार,

ठाणे ज्योतिष संमेलनातील सादर केलेले नोकरी विषयक दुसऱ्या कुंडलीचे विवरण करीत आहोत. जातक ज्यावेळी प्रश्न विचारतो त्या वेळेला  फार महत्त्व असते. जन्मकुंडलीमध्ये उत्तर देण्याच्या काही मर्यादा असतात कारण तो पूर्ण आयुष्याचा आराखडा आहे व त्यातच जन्मवेळ निश्चित माहित असणे आवश्यक असते तसेच नोकरी व विवाह यासारख्या प्रश्नांचा ज्यावेळी कालनिर्णय चुकतो त्यावेळी प्रश्न कुंडली हीच फार महत्त्वाची व मार्गदर्शक ठरते.

सदर कुंडली विवेचण हे जातकाने ज्यावेळी आम्हाला प्रश्न विचारला त्यावेळीची कुंडली व जन्मकुंडली यावरून जाताकास नोकरी केंव्हा मिळेल हे सांगितले होते व तो कालनिर्णय अगदी अचूक ठरला.  म्हणूनच प्रश्नकुंडली ही जन्मकुंडली एवढेच महत्त्वाची असते हे जातकाने लक्षात घेतले पाहिजे. आम्ही जातकास नंबर विचारतो त्याचे महत्त्व काय आहे हे जानून घेतले पाहिजे. असो..!

हा प्रश्न आम्ही जन्म व प्रश्नकुंडली वरून कसा सोडविला आहे व जातकास सांगितलेल्या कालावधीतीलच नोकरी मिळाली याचे उत्तर आम्ही पुढीलप्रमाणे काढले होते.

जातक हे आमच्या परिचयाचे असून एक महिन्यापासून नोकरीच्या शोधात होते कारण पहिली नोकरी काही कारणास्तव सुटली होती. हे जातक नाशिक येथे असून जन्मकुंडली वरून प्रश्न पहावा अशी विनंती केली कारण जन्मकुंडलीचे सर्व डीटेलस योग्य आहे असे त्यांचे म्हणने होते व जातकाने आम्हास सर्व डीटेलस कळविल्यावर लागलेच आम्ही कुंडली मांडली.  जातकाचे दिलेली जन्मवेळ बरोबर आहे की नाही हे पहाणे जन्मकुंडलीत आवश्यक असते यासाठी  आम्ही रुलिंग प्लानेटची नोंद घेतली व त्या प्रश्नवेळेची कुंडली देखिल खाली मांडली आहे. त्या दिवसाचा आमचा पहिलाच प्रश्न असल्याने या प्रश्नकुंडलीस आम्ही महत्त्व दिले व हा प्रश्न पुढील प्रमाणे सोडविला.

सदर जन्मकुंडलीची जन्मवेळ योग्य आहे की नाही बघण्यासाठी रुलिंग प्लानेटची नोंद केली ती अशी.
दि. २३/५/२०१२ वेळ १७:१५ स्थळ: औरंगाबाद  (यावेळेची कुंडली ही खालील भागात दिलेली आहे).
L: शुक्र (केतू)
S: मंगळ (राहू)
R: बुध
D: बुध

जन्मकुंडलीतील लग्न भाव:
मिथून-०६'००'०२'': बुध-मंगळ-चंद्र-गुरु
व दशम भावाचा सब:  बुध

गुरु हा रुलीग मध्ये आहे कारण त्याची दृष्टी  ही लग्न भावावर आहे.  येथे केवळ चंद्र हा रुलीग मधील ग्रह नाही त्यामुळे वेळत कदाचित १-२ मिनिटांचा फरक आढळतो परंतु दशम भावाचा सब बुध हा रुलिंग मध्ये आहे व तो दोन वेळेस आला आहे. त्यामुळे जातकाने दिलेली वेळ योग्य आहे असे आम्ही ग्रहीत धरले.
नियम: १० भावाचा सब हा २, ६, १० किंवा ११ भावापैकीचा कार्येश असेल तर  नोकरी ही २-६-१०-११ या भावाच्या कार्येशाच्या एकत्रित दशकालात मिळण्याची हमी असते.

१० भावाचा सब हा बुध २, ६, १०, ११, पैकी १० चा बलवान कार्येश त्यामुळे नोकरी मिळेल असे सब दर्शवितो.

कालनिर्णयसाठी दशास्वामीकडे वळूया.
जातकास प्रश्नवेळी पुढीलप्रमाणे दशा सुरु होत्या.

येथे २-६-१०-११ अशी दशास्वामीची साखळी जोडायची आहे.
महा. स्वामी गुरु-७-९-१० पैकी १० चा कार्येश

अंतर. स्वा. १-३-४-११-१२ पैकी ११ चा कार्येश

आता साखळी जुळण्यासाठी २ व  ६ ची आवश्यकता आहे.
प्रश्नवेळी चंद्राची विदशा सुरु होती व चंद्र हा २ व ६ चा बलवान कार्येश ग्रह आहे त्यामुळे जातकास या विदशेत
नोकरी मिळाली पाहिजे. ही विदशा २/४/२०१२ ते २२/६/२०१२ पर्यंत होती. प्रश्न हा  २३/५/२०१२ रोजी विचारला आहे त्यामुळे २२/६/२०१२ पर्यंत नोकरी मिळेल असे सांगितले.
आता हाच प्रश्न जातकाने विचारलेल्या प्रश्नवेळी म्हणजेच प्रश्न कुंडलीवरुन सोडविला व नंतर एक शेवटचा निर्णय घेतला .





















प्रश्नवेळी ही बुधाच्या विदाशेत ही २-६-१०-११ ची साखळी जुळून येते. हा कालावधी २८/०५/२०१२ ते २७/६/२०१२
आता प्रश्न कुंडली व जन्म कुंडली वरून येणारा कालावधी हा एकच आहे हे दिसून येते. त्यामुळे प्रश्न कुंडलीलाही फार महत्त्व असते. ठिक आहे, आता पुढे वळू या..

आता आपणास एक ठरविक कालावधीची कल्पना आली आहे व तो साधारण प्रश्न वेळपासून साधारण एक महिन्या नंतर होता त्यामुळे मी रुलिंगच्या ग्रहामधून रविचे भ्रमण बघितले. ज्यावेळी रवि हा राहूच्या नक्षत्रात व बुधाच्या राशीत प्रवेश करेल त्यावेळी घटना घडेल व तो दिवस म्हणजे २३/०६/२०१२  या दिवशी मुद्दाम चंद्राची भ्रमण देखिल बघितले या विदशी चंद्र कर्क राशीत बुधाच्या नक्षत्रात होता व हे सर्व ग्रह रुलिंग मध्ये आहे त्यामुळे याच दिवशी आपणस नोकरी मिळेल असे जातकास कळविले.

एका विशिष्ट दिवशीच आपणास नोकरी मिळेल हे त्यांच्या पचनी पडत नव्हते आणि जातकाने आम्हास २५/०६/२०१२ रोजी फोन केला त्यावेळी आम्ही आई जगदंबेच्या दरबारी म्हजेच माहूरला होतो आणि कळविले की २३/६/२०१२ रोजी त्यांचा इंटरव्यू झाला आहे व त्यांना नोकरी मिळाली असून ते ट्रेनिंगसाठी दिल्लीला निघाले आहे.

अशी ही शास्त्राची प्रचीती येते. ही केस माझ्यासाठी काधीही न विसरणारी अशी आहे. लेख बराच लांबला आहे.  पण काय करणार आपणस समजावे यासाठीची ही आमची धडपड.

!!   जय जगदंब .. जय जगदंब...!! 
आपला,
Preview

शनिवार, १९ जानेवारी, २०१३

कुंडली विवेचण (ठाणे ज्योतिष संमेलन)

|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार,

सदर कुंडली ही आम्ही २८ ऑक्टोबर २०१२ रोजी ठाणे ज्योतिष संमेलनात मांडली होती. आम्हाला नौकरी हा विषय देण्यात आला होता.  या ठिकाणी प्रचीती आलेल्या दोन कुंडलीचे विवेचन केले होते, त्यातील ही एक कुंडली आहे व दुसऱ्या कुंडलीचे विवेचन पुढील लेखात देण्याचा प्रयत्न करू.

सदर जातक हे मॅक्स न्यूयोर्क लाईफ इंशुरन्स या कंपनीत उच्चपदावर अरेया मॅनेजर या पदावर कार्यरत होते, परंतु मागील एक दिढ वर्षात या क्षेत्रात प्रचंड बदल झाला आहे. हे क्षेत्र टारगेटीव् स्वरूपाचे होते व जातक हे उच्चपदावर असल्याने कामाचा बोझा हा वाढतच होता त्यामुळे नौकरीमध्ये बदलीचे योग बघण्यासाठी आमच्याकडे प्रश्न घेऊन आले. मोठे सॅलरी पॅकेज असल्याने याच पद्धतीच्या स्वरूपामध्ये त्याना नौकरी हवी होती. त्यांचे सर्वे सांगणे झाल्यावर आम्ही त्यांच्या कडून २२१ होरा नंबर घेऊन ०२/०७/२०११ रोजी २०:५२ मी. प्रश्न कुंडली मांडली व आम्ही तो पुढील प्रमाणे सोडविला आहे आणि संगीतलेल्या कालवधीतच जातकच्या नौकरीमध्ये बदल झाला आहे.

फोर-स्टेप थेरी बलवान कार्येश ग्रह कसे कार्य करतात याचा अनुभव नेहमी येतो त्यातीलच ही एक कुंडली आहे.
   

नियम : दशम भावाचा सब २-६-१०-११ पैकीचा कार्येश होत असेल तर प्रश्न वेळी त्याच्या दशा-अंतर-विदशा या  देखिल साखळी पद्धतीने २-६-१०-११ ह्या भावाच्या कार्येश असव्या लागतात व दशमचा सब  हा जर ३, ९, १०, १२ पैकीचा कार्येश असेल तर नौकरीत बदल हा याच भावाची साखळी पद्धतीने प्रश्नवेळेच्या दशास्वामीत घडतो तसेच ५ भाव देखिल पूरक भाव नौकरीतील बदलीचा विचार करतात.

प्रथम प्रश्नाचे स्वरूप दर्शविणाऱ्या चंद्राची स्थिती पाहू:
चंद्र:  हा षष्टेश (नौकरीचे स्थान) असून तो ५ (बदल) मध्ये आहे तो गुरुच्या नक्षत्रात  आहे गुरु २ व ११ चा कार्येश असून राहू च्या सब मध्ये आहे व राहू हा १० स्थानी आहे. त्यामुळे जाताकच्या प्रश्नांची ओढ दिसून येते असे चंद्र दर्शवितो.

आता दशम भावाचा सब विचार करू व तो आहे मंगळ व त्याचे ४ स्टेप पुढील प्रमाणे
   मंगळ:                                                                 सबचा निर्णय: 
नक्षत्र स्वा:  चंद्र:  ५ -६                               २-६-१०-११ भावापैकी - १० व ६ बलवान कार्येश
० सब  गुरु:                                          ३-५-९ -१० (नौकारीतील बदल) चा बलवान
सब न स्वा.: केतू :  ४ शु-४-९                     ०० जातकाच्या दोन्ही प्रश्नांचा सबचा होकार
                 न. स्वा: मं.-३-१०                  ०० आता कालनिर्णयासाठी दशास्वामीकडे वळूया.
महादशा स्वामी                                  
०  गुरु:                                                                
न स्वा.: केतू : ४ शु-४-९/मं.-३-१०
० सब:  शनी
 सब न स्वा:  चंद्र: ५-६                              एकूण:  ३-४-५-६-९-१०

अंतरदशा स्वामी
० राहू :                                                    
न स्वा.: बुध ५-८
० सब:
सब न स्वा: ५-६                                      एकूण:   ५-६-८                                    
 
  प्रश्नवेळी दशा                              एकूण:                         साखळी 
गुरु  : १२/०७/२०१२ पर्यत                         ३-४-५-६-९-१०                    ६-१० /३-९
राहू:   २६/२/२०१० ते  २१ ७/२०१२ पर्यत     ५-६-८                                ६ /  ५
येथ साखळी जुळण्यासाठी अशा विदशा स्वामीची निवड करावी लागेल की जो २-११ चा कार्येश असेल.
सर्व ग्रहांचे ४-स्टेप पुढील प्रमाणे:
प्रश्नवेळी विदशा स्वामी :
बुध: २२ /०७/ २०११ पर्यंत
कतू: ११/० ९/२०११   पर्यंत
शुक्र: ०४/०२/२०१२  पर्यंत
रवि:  १९/०३/२०१२  पर्यंत
चंद्र:   ३१/०५/२०१२ पर्यंत  

येथे केवळ चंद्र हा २-११ चा बलवान कार्येश आहे आणि येथे २-६-१०-११ व ३-५-९ -१० ही साखळी जुळून येते.


त्यामुळे जातकाला आम्ही आपली नौकरीतील बदल हा १९ /०३/२०१२  ते ३१/५/२०१२ मध्ये होईल असे सांगितले.  हे ऐकल्यावर ते म्हणाले "हा तर बराच उशीराचा कालावधी आहे व मी तर आताच प्रयत्न करीत आहे. "  कारण प्रश्न हा २/७/२०११ बघितला होता, परंतु आम्ही आमच्या उत्तरावर ठाम होतो. मधल्या काळात त्यांनी नौकरीचे बरेच प्रयत्न केले परंतु नौकारचा योग काही आला नाही आणि जातकास साधारण १५ /०४/२०१२ ICICI Health Sector पनवेल येथून नौकारची ऑफर आली व जातकाची या ठिकाणी उच्चपदावर निवड झाली व ते १/५/२०१२ रोजी औरंगाबाद सोडून पनवेल येथे नौकारीस रुजू झाले. यावेळी ते स्वतः आमच्या ऑफिस पेढे घेउन आले व आमच्या या ज्योतिषशास्त्रास वंदन केले. आजही ते पनवेल येथे नौकरीला आहेत. शास्त्राची प्रचीती ही येतेच यात शंकाच नाही...!

आमचा हा लेख ४-स्टेपचे जनक डॉ. सुनील गों धळेकर सर व कृष्मूर्ती गुरुजींना अर्पण करतो व लेखास पूर्णविराम देतो.
|| शुभम्  भवतु ||

आपला,
Preview




   

मंगळवार, १५ जानेवारी, २०१३

ओटी कशी भरावी ?


|| जय आई जगदंब जगदंब ||

सुती किंवा रेशमी वस्त्र असलेली ओटी भरा ! ताटातील साडीवर तांदुळ, खण, शेंडी देवाकडे करून नारळ ठेवा. ओटीचे साहित्य ओंजळीत घेऊन शरणागत भावाने देवीसमोर उभे रहा ! देवीला भावपूर्ण प्रार्थना करा – ‘हे देवी, तुझ्याकडून चैतन्य मिळूदे आणि माझी आध्यात्मिक उन्नती होऊ दे.’ ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यावर त्यावर तांदुळ वहा.

देवीला अर्पण केलेली साडी प्रसाद म्हणून परिधान करा. खणा-नारळाने देवीची ओटी भरणे, हा देवीच्या दर्शनाच्या वेळचा उपचार अनेकांकडून कारणपरत्वे वर्षातून दोन-चारदा तरी केला जातो. हा उपचार शास्त्र समजून अन् भावपूर्ण केला, तर त्याचा अधिक लाभ भाविकाला होतो. पुढील ज्ञान (माहिती) वाचून देवीची ओटी योग्यरित्या भरून पूजकांनी देवीची कृपा संपादन करावी !

१. देवीची ओटी भरण्याचे महत्त्व काय ? ‘देवीपूजनाची सांगता देवीची ओटी भरून (खण आणि साडी अर्पण करून) करणे, म्हणजे देवीच्या निर्गुण तत्त्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे होय. देवीला खण आणि साडी अर्पण करतांना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्या आधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्त्वाला साडी आणि खण यांच्या रूपाने मूर्त सगुण रूपात साकार होण्यास साहाय्य होते.'

२. देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत
अ. ‘देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून    ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते.
आ. एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण, नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.
इ. ‘देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी’, अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. यामुळे देवीतत्त्व जागृत होण्यास साहाय्य होते.
ई. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वहावेत. उ. देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी, तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे.

३. ओटी भरतांना हातांची ओंजळ छातीसमोर ठेवून उभे राहिल्याने होणारे सूक्ष्मातील लाभ आपल्या मिळतात देवीची ओटी भरतांना देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी. सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करणे अधिक योग्य आहे.

* ताटात साडी ठेवून साडीवर थोडे तांदूळ, खण व नारळ ठेवावा. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. हे सर्व साहित्य हातांच्या ओंजळीत घ्यावे आणि ओंजळ छातीसमोर धरून शरणागतभावाने देवीसमोर उभे राहावे. 'देवीकडून चैतन्य मिळू दे, तसेच आपली आध्यात्मिक उन्नती होऊ दे', अशी भावपूर्ण प्रार्थना करून ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण करावे. नंतर या साहित्यावर थोडे तांदूळ वाहावेत. ओटीची साडी किंवा वस्त्र रंगीबेरंगी आणि कृत्रिम धाग्यांचे (उदा. नायलॉन) टाळा ! निकृष्ट साहित्य असलेली ओटी भरणे टाळा !

|| जय आई जगदंब जगदंब ||

रविवार, १३ जानेवारी, २०१३

नृसिंहसरस्वती स्वामी महाराज जयंती (संक्षिप्त चरित्र)

आज पौष शुध्द २ , श्रीमद नृसिंहसरस्वती स्वामी महाराज यांची जयंती
दुपारी १२ वाजता महाराजांचा जन्मकाळ , जन्म स्थान : कारंजा. जन्मोत्सव श्री क्षेत्र नृसिंहवाडी.

आज पौष शुध्द २ , श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची जयंती
दुपारी १२ वाजता महाराजांचा जन्मकाळ , जन्म स्थान : कारंजा. जन्मोत्सव श्री क्षेत्र नृसिंहवाडी.

माधवस्त्री अंबिका कारंज सती थोर l पूर्वजन्मी तिजसि श्रीवल्लभ वर ll
पुढील जमनी तव कुशि धरीन अवतार l म्हणवूनी आंबे कुशि आले ऐका तिथिवार ll
द्वितीया पौष शुध्द शततारावरी,l माध्यान्ही अवतरले नरहरि शनिवारी ll
आदौ माघ कृष्ण शुभ तिथी भृगुवारी l पुष्पासनी आरुढले त्रिगुण यतिधारी ll
जयदेव जयदेव जयजय त्रिगुणात्मा l श्री दत्त श्रीपाद नरहरी परमात्मा जयदेव जयदेव ll

कारंजा येथील नृसिंह स्वामींचे जन्मस्थान , "काळे वाडा".

श्री नृसिंह सरस्वतींचे संक्षिप्त चरित्र खाली दिले आहे.

सौजन्य : @[100001089557116:2048:Shripad Joshi],श्री. श्रीपाद जोशी, श्री क्षेत्र नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी). मनपूर्वक आभार श्रीपाद जी.. :)

श्री नृसिंह सरस्वती - संक्षिप्त चरित्र (इ.स. १३७८ ते १४५८) 

     श्री नृसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रेयाचे दुसरे अवतार. श्रीपाद श्रीवल्लभ हा पहिला अवतार. त्यांनीच करंजनगर नावाच्या गावी जन्म घेतला. त्यांच्या वडिलांचे नाव माधवराव व आईचे नाव अंबाभवानी असे होते. पती-पत्नी दोघेही शिवभक्त होते. मुलाचे नाव जन्मतःच शाळिग्रामदेव असे ठेवले. नंतर मोठ्या थाटाने त्याचे बारसे साजरे करून नरहरी हे व्यावहारिक नाव विधीपूर्वक ठेवण्यात आले. 

        जन्मतःच हे मूल 'ॐ' कार हा शब्द म्हणू लागले. बालक मोठे होऊ लागले. तीन वर्षाचे झाले तरी 'ॐ' काराखेरीज एकही दुसरा शब्द ते बोलत नव्हते. मुलगा सात वर्षाचा झाला तरीही 'ॐ' काराशिवाय काहीही बोलू लागला नाही. माधवराव व अंबा भवानी मनात  फार कष्टी झाले. त्यांनी शिवपार्वतीची आराधना केली. त्यांच्या कृपाप्रसादाने आम्हाला मुलगा झाला, तोही मुका असावा, या गोष्टीमुळे ते पती-पत्नी खूप दुःखी बनली. 

        एक दिवस अंबाभवानी नरहरीला जवळ घेऊन म्हणाली, ''बाळ, तू अवतारी पुरुष आहेस, युगपुरुष आहेस, असे ज्योतिषी सांगतात. आमच्या भाग्याने तू आमच्या घरी जन्माला आलास. तू जगद्गुरू असावास याबद्दल आमची खात्री झाली आहे. तू शक्तिमान आहेस. तू बोलू का लागत नाहीस? तुझे बोल ऐकण्याची आमची इच्छा आहे. तेवढी पुरी कर !'' मुलाने मातेचे हे उद्गार ऐकून खुणेने सांगितले की, माझी मुंज करून दिलीत की, मला सगळे काही बोलता येईल !'' 

        व्रतबंधाकरिता मुहूर्त ठरविण्यात आला. सर्व तयारी केली. मुंजीला चतुर्वेदी ब्राह्मण आमंत्रित केले. मुंजीचा सोहळा पाहण्यास अलोट गर्दी लोटली. माधवरावांनी नरहरीच्या कमरेभोवती मौजीबंधन केले व ठरलेल्या शुभ मुहूर्तावर त्याच्या कानात गायत्री मंत्राचा तीन वेळा उच्चार केला. नरहरीने मनातल्या मानत गायत्री मंत्राचा उच्चार केला. उघडपणे केला नाही. लोक हसले; म्हणाले, ''मुका मुलगा गायत्री मंत्र काय उच्चारणार?''  

        अंबा भवानी या त्याच्या आईने पहिली भिक्षा देऊन त्याला आशीर्वाद देताच त्याने ऋग्वेदातील प्रथम मंत्राचा स्पष्टपणे उच्चार करून, ऋग्वेद म्हणून दाखवला. दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेदातील प्रारंभीचा भाग व यजुर्वेद म्हणून दाखवला. आईने तिसरी भिक्षा घालताच त्याने सामवेदाचे गायन करून दाखवले. माधवराव व अंबाभवानी यांना अत्यंत आनंद झाला. मुका मुलगा चारी वेद बोलून दाखवू लागला, हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले. 

        नरहरी आपल्या आईला म्हणाले, ''आई, मला आता निरोप दे. तीर्थयात्रेला जावे असा मी निश्चय केला आहे. घरोघरी भिक्षा मागून, ब्रह्मचर्याचे पालन करून, वेदाभ्यास करावा असा माझा मानस आहे.'' हे ऐकून आईला फारच दुःख झाले. 

        ''जेव्हा माझे चिंतन कराल, मला भेटण्याची उत्कंठा वाटेल तेव्हा मी तुम्हाला मनोवेगाने येऊन भेटेन.'' असे नरहरीने आश्वासन दिल्यावर त्याच्या आई-वडिलांनी त्याला संन्यासदीक्षा घेण्यास मान्यता दिली.

        नरहरी  प्रथम काशीक्षेत्र या ठिकाणी गेले. तेथे त्यांनी अध्ययन केले. कृष्ण सरस्वती यांचा अधिकार जाणून नरहरींनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली व त्यानंतर ते नृसिंह सरस्वती या नावाने प्रसिध्द झाले. 

        श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी दक्षिणेकडील निरनिराळ्या तीर्थांना भेट दिली. नरसोबाची वाडी येथे बारा वर्षे राहून त्यांनी लोकोद्धाराचे प्रचंड कार्य केले. पुढे ते गुप्त रूपाने संचार करीत गाणगापूर येथे प्रगट झाले. त्यांचे असंख्य शिष्य होते. श्री गुरूंनी सर्व शिष्यांना बोलाविले आणि सांगितले की, ''आम्ह्ची प्रसिद्धी फार झाली आहे. यापुढे गुप्त राहावे असे मनात आहे. मी तुम्हाला सोडून जात नसून फक्त गुरुरुपाने येथे राहणार आहे. 
जे जे असती माझ्या प्रेमी l 
त्यांते  प्रत्यक्ष दिसे नयनी l 
लौकिकमते अविद्याधर्मी l 
जातो श्रीशैल्ययात्रेसी ll 

        श्री गुरु म्हणाले, ''जे लोक माझी भक्ति करतील, मनोभावे माझे गुणगान करतील, त्यांच्या घरी आम्ही सदैव राहू. त्यांना व्याधी, दुःख आणि दारिद्र्याचे भय असणार नाही. त्यांच्या सर्व मनोकामनांची पूर्ती होईल. माझे चरित्र जे वाचतील त्यांच्या घरी निरंतर लक्ष्मी, सुख व शांति लाभेल, असे सांगून ते त्यांच्या इच्छेनुसार भक्तांनी केलेल्या फुलांच्या आसनावर बसले. ते आसन नावेसारखे पाण्यात सोडले. भक्तांच्या भावना अनावर झाल्या. ''लौकिकमताने मी जात आहे. तरी भक्तांच्या घरी व गाणगापूरला माझे सान्निध्य सदैव राहील.'' असे श्री गुरूंनी सांगितले. नंतर ते पोचल्यावर प्रसादाची खूण म्हणून फुले वाहत आली. 

तू भक्तजना कामधेनु l  मनुष्यदेही अवतरोनु l 
तुझा पार न जाणे कवणू l  त्रैमूर्ती तूच होसी ll 

        श्री गुरूंच्या लीलाकथा श्रीगुरूचरित्रात आलेल्या आहेत. आजही श्री गुरु गाणगापुरातच आहेत. भक्तांना ते दर्शन देतात.

माधवस्त्री अंबिका कारंज सती थोर l पूर्वजन्मी तिजसि श्रीवल्लभ वर ll
पुढील जमनी तव कुशि धरीन अवतार l म्हणवूनी आंबे कुशि आले ऐका तिथिवार ll
द्वितीया पौष शुध्द शततारावरी,l माध्यान्ही अवतरले नरहरि शनिवारी ll
आदौ माघ कृष्ण शुभ तिथी भृगुवारी l पुष्पासनी आरुढले त्रिगुण यतिधारी ll
जयदेव जयदेव जयजय त्रिगुणात्मा l श्री दत्त श्रीपाद नरहरी परमात्मा जयदेव जयदेव ll

कारंजा येथील नृसिंह स्वामींचे जन्मस्थान , "काळे वाडा".

श्री नृसिंह सरस्वतींचे संक्षिप्त चरित्र खाली दिले आहे.

सौजन्य : Shripad Joshi (श्री. श्रीपाद जोशी), श्री क्षेत्र नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी). मनपूर्वक आभार श्रीपाद जी.. :)

श्री नृसिंह सरस्वती - संक्षिप्त चरित्र (इ.स. १३७८ ते १४५८)

श्री नृसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रेयाचे दुसरे अवतार. श्रीपाद श्रीवल्लभ हा पहिला अवतार. त्यांनीच करंजनगर नावाच्या गावी जन्म घेतला. त्यांच्या वडिलांचे नाव माधवराव व आईचे नाव अंबाभवानी असे होते. पती-पत्नी दोघेही शिवभक्त होते. मुलाचे नाव जन्मतःच शाळिग्रामदेव असे ठेवले. नंतर मोठ्या थाटाने त्याचे बारसे साजरे करून नरहरी हे व्यावहारिक नाव विधीपूर्वक ठेवण्यात आले.

जन्मतःच हे मूल 'ॐ' कार हा शब्द म्हणू लागले. बालक मोठे होऊ लागले. तीन वर्षाचे झाले तरी 'ॐ' काराखेरीज एकही दुसरा शब्द ते बोलत नव्हते. मुलगा सात वर्षाचा झाला तरीही 'ॐ' काराशिवाय काहीही बोलू लागला नाही. माधवराव व अंबा भवानी मनात फार कष्टी झाले. त्यांनी शिवपार्वतीची आराधना केली. त्यांच्या कृपाप्रसादाने आम्हाला मुलगा झाला, तोही मुका असावा, या गोष्टीमुळे ते पती-पत्नी खूप दुःखी बनली.

एक दिवस अंबाभवानी नरहरीला जवळ घेऊन म्हणाली, ''बाळ, तू अवतारी पुरुष आहेस, युगपुरुष आहेस, असे ज्योतिषी सांगतात. आमच्या भाग्याने तू आमच्या घरी जन्माला आलास. तू जगद्गुरू असावास याबद्दल आमची खात्री झाली आहे. तू शक्तिमान आहेस. तू बोलू का लागत नाहीस? तुझे बोल ऐकण्याची आमची इच्छा आहे. तेवढी पुरी कर !'' मुलाने मातेचे हे उद्गार ऐकून खुणेने सांगितले की, माझी मुंज करून दिलीत की, मला सगळे काही बोलता येईल !''

व्रतबंधाकरिता मुहूर्त ठरविण्यात आला. सर्व तयारी केली. मुंजीला चतुर्वेदी ब्राह्मण आमंत्रित केले. मुंजीचा सोहळा पाहण्यास अलोट गर्दी लोटली. माधवरावांनी नरहरीच्या कमरेभोवती मौजीबंधन केले व ठरलेल्या शुभ मुहूर्तावर त्याच्या कानात गायत्री मंत्राचा तीन वेळा उच्चार केला. नरहरीने मनातल्या मानत गायत्री मंत्राचा उच्चार केला. उघडपणे केला नाही. लोक हसले; म्हणाले, ''मुका मुलगा गायत्री मंत्र काय उच्चारणार?''

अंबा भवानी या त्याच्या आईने पहिली भिक्षा देऊन त्याला आशीर्वाद देताच त्याने ऋग्वेदातील प्रथम मंत्राचा स्पष्टपणे उच्चार करून, ऋग्वेद म्हणून दाखवला. दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेदातील प्रारंभीचा भाग व यजुर्वेद म्हणून दाखवला. आईने तिसरी भिक्षा घालताच त्याने सामवेदाचे गायन करून दाखवले. माधवराव व अंबाभवानी यांना अत्यंत आनंद झाला. मुका मुलगा चारी वेद बोलून दाखवू लागला, हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले.

नरहरी आपल्या आईला म्हणाले, ''आई, मला आता निरोप दे. तीर्थयात्रेला जावे असा मी निश्चय केला आहे. घरोघरी भिक्षा मागून, ब्रह्मचर्याचे पालन करून, वेदाभ्यास करावा असा माझा मानस आहे.'' हे ऐकून आईला फारच दुःख झाले.

''जेव्हा माझे चिंतन कराल, मला भेटण्याची उत्कंठा वाटेल तेव्हा मी तुम्हाला मनोवेगाने येऊन भेटेन.'' असे नरहरीने आश्वासन दिल्यावर त्याच्या आई-वडिलांनी त्याला संन्यासदीक्षा घेण्यास मान्यता दिली.

नरहरी प्रथम काशीक्षेत्र या ठिकाणी गेले. तेथे त्यांनी अध्ययन केले. कृष्ण सरस्वती यांचा अधिकार जाणून नरहरींनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली व त्यानंतर ते नृसिंह सरस्वती या नावाने प्रसिध्द झाले.

श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी दक्षिणेकडील निरनिराळ्या तीर्थांना भेट दिली. नरसोबाची वाडी येथे बारा वर्षे राहून त्यांनी लोकोद्धाराचे प्रचंड कार्य केले. पुढे ते गुप्त रूपाने संचार करीत गाणगापूर येथे प्रगट झाले. त्यांचे असंख्य शिष्य होते. श्री गुरूंनी सर्व शिष्यांना बोलाविले आणि सांगितले की, ''आम्ह्ची प्रसिद्धी फार झाली आहे. यापुढे गुप्त राहावे असे मनात आहे. मी तुम्हाला सोडून जात नसून फक्त गुरुरुपाने येथे राहणार आहे.
जे जे असती माझ्या प्रेमी l
त्यांते प्रत्यक्ष दिसे नयनी l
लौकिकमते अविद्याधर्मी l
जातो श्रीशैल्ययात्रेसी ll

श्री गुरु म्हणाले, ''जे लोक माझी भक्ति करतील, मनोभावे माझे गुणगान करतील, त्यांच्या घरी आम्ही सदैव राहू. त्यांना व्याधी, दुःख आणि दारिद्र्याचे भय असणार नाही. त्यांच्या सर्व मनोकामनांची पूर्ती होईल. माझे चरित्र जे वाचतील त्यांच्या घरी निरंतर लक्ष्मी, सुख व शांति लाभेल, असे सांगून ते त्यांच्या इच्छेनुसार भक्तांनी केलेल्या फुलांच्या आसनावर बसले. ते आसन नावेसारखे पाण्यात सोडले. भक्तांच्या भावना अनावर झाल्या. ''लौकिकमताने मी जात आहे. तरी भक्तांच्या घरी व गाणगापूरला माझे सान्निध्य सदैव राहील.'' असे श्री गुरूंनी सांगितले. नंतर ते पोचल्यावर प्रसादाची खूण म्हणून फुले वाहत आली.

तू भक्तजना कामधेनु l मनुष्यदेही अवतरोनु l
तुझा पार न जाणे कवणू l त्रैमूर्ती तूच होसी ll

श्री गुरूंच्या लीलाकथा श्रीगुरूचरित्रात आलेल्या आहेत. आजही श्री गुरु गाणगापुरातच आहेत. भक्तांना ते दर्शन देतात.

बुधवार, ९ जानेवारी, २०१३

जन्मवेळ निश्चिती (किमया शासक ग्रहांची)

|| श्री स्वामी समर्थ ||

नमस्कार,

ज्योतिष शास्त्रामध्ये जन्मवेळ निश्चित करण्याच्या वेगवेगळया पद्धती आहेत, परंतु कृष्णमूर्तीपद्धती मध्ये रुलिंग प्लानेटसच्या  (शासकग्रह) आधारे लग्नशुद्धी तसेच जन्मवेळ ही निश्चित करणारी पद्धती अतिशय सहज व उत्तम आहे त्यामुळेच हजबे गुरुजींनी यास 'यक्षियणीची कांडी' म्हटले आहे. याच शासक ग्रहाचा वापर करून कोणत्याची प्रश्नांचे निश्चित कालखंड सांगता येतो यासाठी हवे असते तर तारतम्य व सामान्यज्ञान.

काल जातकाच्या पत्नीने जातकाचे डीटेलस् या ब्लॉगच्या माध्यमातून आमच्या पर्यंत पोहचविल्या व पुन्हा फोन करून जातकाच्या जन्मवेळ  ह्या दोन वेगवेगळ्या आहेत, एक वेळ ही ११:४५ रात्री तर दुसरी ही १२:४५ त्यामुळे  नेमकी वेळ कुठली आहे यामध्ये नेहमी कन्फुजन असते असे त्या म्हणाल्या.  मी त्यांना आज सायंकाळी  भेटण्याची वेळ दिली.

आमच्या पोटापाण्यासाठी चालणारा संघानाकावरचा व्यवहार हा आज दुपारीच संपला होता व आज भेट देणाऱ्या जातकापैकी या जाताकाच्या जन्मवेळ दोन लिहिलेल्या बघीतल्यावर जन्मवेळ निश्चित करण्यासाठी आम्ही काम्पुटरमधील ज्योतिषचा पसारा उघडला व रुलींग प्लानेटसची नोंद घेतली ती पुढील प्रमाणे.

दिनांक: ०९/०१/२०१३ - वेळ दुपारी १२:३७:४१, औरंगाबाद

L:  (लग्न स्वामी) - मंगळ
LS: (लग्न नक्षत्रस्वामी) - केतू
S: (नक्षत्रस्वामी) - बुध
R: (राशीस्वामी) - मंगल
D: (वारस्वामी ) - बुध

जेंव्हा रुलिंगमध्ये चार पेक्षा कमी ग्रह असतात त्यावेळी लग्न स्थावर दृष्टी ठेवणारे तसेच लाग्नेशाच्या युती-दृष्टीतील ग्रहांचा देखील रुलींगच्या ग्रहामध्ये उपयोग करावा लागतो.

याठिकाणी राहू व शनी ची दृष्टी हि लग्न भावावर असून गुरुची दृष्टी ही लग्नेश मंगळावर आहे. त्यामुळे राहू, शनी व मंगळ हे देखील अप्रत्यक्षपणे रुलिंगमध्ये आहे. याचा उपयोग करून जन्मवेळ निश्चित करावी लागेल.  जातकाचे माहिती पुढीलप्रमाणे आहे.

जातक: पुरुष
जन्म दिनांक: २६/०३/१९६४  किंवा २७/०३/१९६४  (वेळ बदल झाल्याने तारीख बदलली)
वेळ : रात्री २३:४५ मी.               /     ००:४५ मी.
जन्मस्थळ: चंद्रपूर

वरील दोन्ही वेळेच्या कुंडली मांडल्या:
वेळ : २३:४५                                                             वेळ : ००:४५
लग्न : वृश्चिक  २६'१२''४५                                          लग्न : धनु  ९'५२''५९  
लग्नभाव: वृश्चिक: मंगळ-बुध-गुरु                              लग्नभाव: धनु :- गुरु-केतू-शनी

वरील निरीक्षण केल्यास लक्षात येती  की -  मंगळ हा रुलिंगमध्ये प्रथम दर्जेचा ग्रह आहे तसेच बुध हा देखील ग्रह वृश्चिक लग्नामध्ये आहे व लग्न भावाचा सब गुरु हा देखील रुलिंगमध्ये अप्रत्यक्षपणे आहे त्यामुळे जातकाची वेळ ही २३:४५ आहे हे निश्चित होते.

जातकाच्या पत्नीने सायंकाळी जातकाची जुनी पत्रिका सापडली आहे व त्यात २३:४५ ही वेळ नमूद केली आहे असे सांगितले तत्त्पुर्वी आह्मी या वेळेची पत्रिका दुपारीच तयार केली आहे व आम्ही त्यास ते दाखविले. जिवनातील सर्व घटना ह्या वेळेशी जुळवून येतात हे देखील सिद्ध केले. त्यांनी आमच्या या आत्माविश्वासाचे कौतुक केले.

या  कौतुकाचे पात्र आम्ही नसून गुरुवर्य कृष्मूमूर्ती व ही पद्धती आहे यात शंकाच नाही. 

आपला,
Preview

बुधवार, २ जानेवारी, २०१३

मोक्षम् देही राहू

|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार,

सध्या New Year मुळे आमच्या कामाचा ओघ थोडा कमी आहे त्यामुळे सकाळच्या वेळी आह्मी थोडे निवांत असतो . या ब्लॉगच्या निमित्याने आम्ही फेसबुक सारख्या सोशल नेटवर्क संभध आला त्यातील एक ग्रुप या आमच्या शास्त्राला नावे ठेवण्यात फुढे आहे.  अशांना आम्ही काय सांगावे.... असो..! 

काल एक जातक आपली जन्मपत्रिक घेउन आले.  समस्या व अडचणींची लिस्ट तपशीलवारपणे आमच्या समोर मांडली. जन्मपत्रिका ही हाताने बनविलेले जीर्ण झालेली होती, ग्रह हे पुसट व ग्रहांचे मागील व पुढील अक्षरे दिसत नव्हती ते पाहून पुन्हा मनात म्हटले की कधी जातक आपल्या १२ चौकटीच्या या कुंडलीला महत्व देतील.  आम्ही या जीर्ण झालेल्या या पत्रिकेचा उद्धार तर केला, परंतु  त्याच्या दैवाचा उद्धार मात्र स्वामी महाराजवर सोडविला.

पत्रिका बनवून झाल्यावर व निरीक्षण केल्यावर आम्ही त्यास काही प्रश्न विचारले ते असे  की आपल्या घरात वडील, भावंड, किवा काका यापैकी कोणी अग्नी तत्वाचे निधन झाले आहे असे दिसून येते यावर ते जातक दोन मिनिटे स्तब्ध झाले व एकसारखे माझ्याकडे पाहत होते व त्यांनी हळुवारपणे सांगितले की वडील व बहिण दोघेही आगीत जळून मृत पावले आहेत. आम्ही हे कसे ओळखले म्हणजेच diagnosis कसे केले असे ते विचारणी करू लागले. त्याचे विवरण आम्ही खाली दिलेच आहे व शास्त्राची प्रचीती कशी येती हे पुन्हा सिद्ध होते.

जातक:  पुरुष                  जन्म दि. १०/०४/१९७७
 जन्म वेळ: स. ५:३०        जन्म स्थळ : औरंगाबाद 

राहू व मंगळ दोन्ही ग्रह निरीक्षण केल्यास लक्षात येते की राहू हा अष्टमस्थानी (मृत्यू स्थान) आहे व तो मंगळच्या नक्षत्रात आहे व मंगळ हा १२ व्या स्थानी (मोक्ष स्थान) आहे.  हा मंगळ नवमेश (पित्याचे स्थान) आहे व तो शनी (मृत्यू कारक)  च्या राशीस असून हा शनी लाभेश (काका, मित्र, मोठा भाऊ) आहे. मंगळ (अग्नी तत्त्व) हा गुरुच्या नक्षत्रात आहे व गुरु हा वृषभेला (शुक्र - त्रीतेयेश - लहान बाहीण) आहे.  रवि (वडिल कारक) व शुक्र युती प्रथम स्थानी मीन या मोक्षम् राशीत आहे व राहू व मंगळाचा भावाचलित कुंडलीत मध्ये षडाष्टक योग आहे.  

वरील सर्व तत्त्वाचा विचार केल्यावर आह्मी जातकाचे वडील किंवा भावंडे अग्नी तत्त्वाने मृत्यू झाला असेल असा निष्कर्ष काढाला व तो खरा ठरला.  ही केवळ एक कुंडली नसून आशा कुंडल्याचा संकीर्ण आमच्याजवळ आहे त्यामुळे शास्त्र आहे त्याचा आभ्यास निट पाहिजे काही मुठभर लोकांमुळे शास्त्राला नाव ठेवणे कितपत योग्य आहे ते आपणच ठरविले पाहिजे. दोन भिन्न चित्र एकत्रित करून काही वेगळे भासवीणाऱ्याना स्वतः आत्मपरीक्षण केले पाहिजे.

आपला,
Preview