रविवार, ७ ऑगस्ट, २०१६

गुरु पालट (गुरूचा कन्या राशीत प्रवेश)

!! श्री स्वामी समर्थ !!
गुरु महाराज ११ ऑगस्ट रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. “गुरु मला कितवा आहे, कसा आहे” अशी सध्या रोजी विचारनी सुरु असते. ज्योतिष शास्त्रातील काही माहित असो अथवा नसो परंतू पूर्वी पासून कोणाकुडून ऐकत असलेला हा ज्योतिषास चीमटभर भाग सर्वांना माहित असतो अथवा जाणून घेण्याची उत्सुकता हि असते. त्यात मग ४, ८, आणि १२ हे खडतळ, त्रासदायी, कष्टप्रद असा असतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे १२ वा गुरु मुलीच्या विवाहास अडचणी देणारा, ‘गुरुबळ’ नाही, अशी माहीती लोकांमध्ये प्रचलित आहे कि ते समजाविणे आता कठीण आहे. माझ्या ब्लोगवर माझ्या एका ज्योतीष मित्राच्या बहिणीस १२वा गुरु सुरु असताना विवाह झाला आहे व त्या पत्रिकेचे विश्लेषण देखील मी केले आहे. असो.. अहो..!! कुठलाही ग्रह ४, ८, १२ गोचर हे वाईट परिणाम देणारे थोड्याप्रमाणे असते त्यात गुरु असा वेगळा अपवाद नाहीच आहे. जन्म कुंडलीत दशास्वामी काय परिणाम देणार आहे ते देखील महत्त्वाचे ठरते. सध्यातरी एवढेच सांगेल कि ४ गुरु सुरु असेल त्यांनी घरात वाद टाळा, ८ गुरु सुरु असेल तर कुणास पैसे उधार देणे, शेअर मार्टेकमध्ये खूप पैसा लावणे टाळावे, १२ गुरु मनासारखे न घडणारे असा असतो, परंतू तो अध्यात्मिक प्रगती निश्चित करतो. गुरु भक्तीची वाढ निर्माण करतो. गुरूचा कन्या राशीतल प्रवेशा समयीच “ श्री नृसिंह स्वामी महाराजांनी” आपले अवतार कार्य संपून श्री शैल्यास निघून गेले. कन्यागत गुरु म्हणजे “गंगा-कृष्णा” भेटपर्व असा उत्सव श्री क्षेत्र वाडीस सुरु होणार आहे असा योग १२ वर्षांनी येतो. मग या ४ ८ आणि १२ गुरूचा आपण कसा परिणाम भोग्याचा याची तयारी तुमची तुम्ही थोड्याफार प्रमाणात करू शकता...!!! बाकी शेष स्वामी महाराजावर सोपवावे... गुरुविण मज कोण दाखवील वाट ...!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा