बुधवार, ३ ऑगस्ट, २०१६

ज्योतिषशास्त्र

!! श्री स्वामी समर्थ !!
पाच वेदांगापैकी ज्योतिष एक वेदांग आहे. ज्योतिषाचा अनुभव हा येतो. यासाठी हवी असते आपली श्रद्धा व अध्यात्मिकता. आयुष्यातील घटना या लिखित आहे त्यात तुमच्या कर्माचा आधार असतो आणि त्याप्रमाणे फळ मिळते. सध्या प. प. टेंबे स्वामीनि रचित मंत्र साधना पोस्ट करत आहे. शंकाखोराना त्याचा लाभ मुळीच होणार नाही. मंत्रात प्रचंड ताकद असते हे माझ्या अनुभवांनी सांगत आहे. कुठलाही मंत्र हा तुमच्या प्रयत्न कर्माला साथ देणारा असतो. आजारी व्यक्तीने डॉक्टरचा सल्ला औषधी घेणेच भाग पडते मग मंत्र आत्मबल वाढेल. श्री स्वामी समर्थ महाराजांचे एक वाक्य सर्वांना माहित आहे. "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे." तर मग कुणाच्या पाठीशी आहे स्वामी...!! जो कि सातत्याने प्रयत्न करतो. त्याच प्रमाणे रत्न व यंत्र यांचा देखील उपयोग होतो. रत्न हे तुमच्या प्रयत्नाला संधी निर्माण करतात. तुमचे भाग्य बदलत नाही. शास्त्राची किती आहारी जायचे ते आपणच ठरवावे. नाही तर रात्री न्यूज च्यानलवर "Yes I can change" म्हणारे भरपूर ज्योतिष झाले आहे. प्रथम साधक व्हावे लागेल. मन-बुद्धी-अंतकरण शुद्ध होईल तरच उपाय हे उपयोगी पडतील. खोटे, फसवणूक करणारे, ब्ल्याक मार्केटिंग करणाऱ्याच्या हातात केवळ रत्न दिसतील पण अशा लोकांना मंत्राचा उपयोग होणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.
गुरुदेव दत्त..!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा